शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर हल्ला करण्यासाठी जैश, आयएसआयची बैठक; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 10:07 IST

रावळपिंडीत जैश ए मोहम्मद आणि आयएसआसची बैठक; भारतावर मोठा हल्ला करण्याच्या योजनेवर चर्चा

नवी दिल्ली: भारतावर मोठा हल्ला घडवण्याची तयारी पाकिस्तानकडून केली जात आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच रावळपिंडीत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयमध्ये एक गोपनीय बैठक झाली. यामध्ये भारतावर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. या बैठकीची माहिती मिळताच भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.२० ऑगस्टला जैशचा दहशतवादी अमीर मौलाना अब्दुल रौफ असगरनं (मसूद अजहरचा भाऊ) रावळपिंडीत आयएसआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला अशगरचा भाऊ मौलाना अम्मारदेखील उपस्थित होता. बालाकोटवरील एअर स्ट्राईकनंतर भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तान सरकारनं सुटका केली. त्यानंतर अम्मारनं पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याची ध्वनीफित व्हायरल झाली होती. बालाकोट हल्ल्याचा बदला घेऊ, अशी धमकी त्यानं तालीम-उल-कुरानमधील मदरशात दिली होती.गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रावळपिंडीत अब्दुल रौफ आणि आयएसआयमध्ये एक बैठक झाली. या बैठकीचं आयोजन इस्लामाबादमधून करण्यात आलं होतं. जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी आणि कारी जरारनं भारतावरील हल्ले भारतावरील हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याच्या योजनेवर चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीच बैठक पुलवामा हल्ल्याच्या आधीदेखील झाली होती.कोण आहेत अशगर खान काश्मिरी आणि कारी जरार?अशगर खान काश्मिरी आधी दहशतवादी संघटना हरकतउल मुजाहिद्दीनच्या मजलिस ए शूराचा सदस्य होता. त्यानंतर त्यानं त्याच्या काही साथीदारांसह जैश-ए-मोहम्मद संघटनेत प्रवेश केला. तर कारी जरार पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या लॉन्चिंग पँडचा कमांडर आहे. २०१६ मध्ये नगरोटामधील लष्करी तळावर हल्ला झाला. जरार त्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदISIआयएसआय