Jagdeep Dhankhar: भारताचे उपराष्ट्रपती यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असला तरी, विरोधकांकडून वेगळाच संशय व्यक्त होतोय. दरम्यान, धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता नवीन उपराष्ट्रपतीच्या नावाबाबत कवायती सुरू झाल्या आहेत. अशातच, बिहारमधील भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करण्याची मागणी केली आहे.
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल म्हणाले की, जर नितीश कुमार उपराष्ट्रपती बनले, तर यापेक्षा चांगले काय असू शकते. ही बिहारसाठी अभिमानाची बाब असेल. भाजप आमदाराच्या या मागणीनंतर राजकीय हालचाली वाढणार आहेत. कारण वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री नितीश यांना उपराष्ट्रपती बनवण्याच्या मागणीचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. मात्र, याबाबत स्वतः मुख्यमंत्री नितीश यांनी कोणतेही विधान केलेले नाही.
यापूर्वीही अशी मागणी करण्यात आली मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल वेळोवेळी अनेक अटकळ आणि मागण्या करण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी नितीश कुमार यांना देशाचे उपपंतप्रधान बनविण्याची मागणी केली होती. त्यावेळीही चौबे यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री नितीश यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने आधीच सांगितले आहे की, ते नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवतील. अशा परिस्थितीत, या नवीन मागणीने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.