शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
2
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
3
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
4
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
5
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
6
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
7
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
8
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
10
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
11
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
12
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
13
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
14
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
15
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
16
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
18
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
19
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
20
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला 15 दिवसांत निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 14:05 IST

जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची प्रशंसा केली होती.

हैदरबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डींनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहेत. आंध्रातील जगनमोहन रेड्डींच सरकार महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असून निष्काळजीपणा चालणार नाही. त्यासाठी ठोस पाऊल उचलण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आंध्र प्रदेश सरकार नवीन कायदा अमलात आणण्याची तयारी करत आहे. त्यानुसार महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची प्रशंसा केली होती. तसेच तेलंगणा पोलिसांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. एकीकडे काहींनी या एन्काऊंटरला विरोध केला आहे, तर काहींनी पोलिसांच्या कृतींचं समर्थन केलं आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चर्चेदरम्यान सीएम जगनमोहन रेड्डी, यांनी मी दोन मुलींचा बाप असल्याचंही सांगितलं. मला एक बहीण आहे आणि एक पत्नी आहे. जर माझ्या मुलींसोबत असं काही झालं असतं तर माझी काय प्रतिक्रिया असती?, मी कोणता न्याय मागितला असता?, असंही रेड्डींनी म्हटले होते. 

जगनमोहन सरकार राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर झालं आहे. त्यामुळे, महिलांवरील बलात्काराच्या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद नवीन कायद्यात करण्यात येत आहे. सरकारकडून याबाबतची तयारी सुरू आहे. त्यानुसार, भारतीय दंड संहिता, आयपीसीच्या कलम 354 मध्ये सुधारणा करुन नवीन कलम 354 ई लागू करण्यात येईल. या नवीन कलमानुसार महिला आणि लहान मुलांवर लैंगिक अत्याचार आणि हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात येईल. विशेष म्हणजे काही आठवड्यांतच या खटल्यांवर फास्ट्रट्रक सुनावणी करण्यात येईल. विशेष म्हणजे केवळ 15 दिवसांत खटला निकाली काढण्याची तरतूदही या कायद्यात होईल. तसेच, दोषींना 3 आठवड्यांत शिक्षा देण्याचीही तरतूद या कायद्यान्वये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी हा कायदा लागू करण्याचं निश्चित केलंय, कारण राज्यातील महिला आणि बालकांची सुरक्षा हेच प्राधान्यक्रम असणार आहे.  

दरम्यान, हैदराबाद बलात्कार प्रकरणामुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हैदराबाद पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारbillबिलhyderabad caseहैदराबाद प्रकरण