शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

'आता परत सत्तेत येणे अवघड...', काँग्रेसच्या भवितव्याबाबत शशी थरुर यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:52 IST

Shashi Tharoor : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा तीन विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.

Shashi Tharoor : गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसने चांगले प्रदर्शन केले, पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या हाती मोठी निराशा आली. नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत तर पक्षाला सलग तिसऱ्यांदा भोपळा मिळाला. यातच आता खासदार शशी थरुर यांनी काँग्रेसच्या भवितव्यावर  महत्वाची टिप्पणी केली आहे. 

शशी थरुर म्हणतात की, तुम्हाला देशात बदल घडवून आणायचा असेल, तर एकटे लढून चालणार नाही, तर इतर पक्षांना सोबत घ्यावे लागेल. यूपी आणि बिहारमध्ये आम्ही आघाडी करुनच पुढे जाऊ शकतो. दिल्लीत पक्ष तीन वेळा सत्तेबाहेर असल्याने दिल्लीत पुनरागमन कठीण आहे. कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षाचा उल्लेख करत थरुर म्हणतात, काँग्रेस आज प्रत्येक राज्यात एक-दोन जागावर आहे, मात्र इतर पक्ष केवळ एक दोन राज्यांपुरते मर्यादित आहेत.

अशी अनेक राज्ये आहेत, जिथे काँग्रेस आघाडी करुनच पुढे जाऊ शकते. उदाहरणार्थ, काँग्रेस 1996 पर्यंत यूपीमध्ये स्वबळावर सत्तेत होती आणि सरकारही चालवले, पण आता त्याची शक्यता फारच कमी आहे. समाजवादी पक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षाशी युती करूनच आपण पुढे जाऊ शकतो. बिहारमध्येही तेच आहे. तमिळनाडूतही आमची द्रमुकसोबत आघाडी आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याची कहाणी वेगळी आहे.

कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस जी ताकद दाखवू शकते, ती पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखवू शकणार नाही, पण आम्ही वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. देशात बदल घडवून आणायचा असेल, तर प्रत्येकवेळी स्वबळावर लढण्याची गरज नाही. एकाच विचारधारेच्या इतर पक्षांसोबत पुढे जाता येऊ शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले. यावरुन आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करणार असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपा