शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

ती एक घोडचूक! नेहरूंनी योग्य निर्णय घेतला असता तर Pok भारताचा भाग असता - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:37 IST

आज लोकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, जम्मू काश्मिरमधील कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले.

गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन नवीन विधेयकांवर चर्चा केली. यावर बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. आपल्या भाषणात शाह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले आहेत. 'जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती कायदा २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक २०२३ ही सत्तर वर्षांपासून अन्याय, अपमान आणि दुर्लक्ष झालेल्यांना न्याय देण्यासाठी विधेयके आहेत. 

शाह म्हणाले की, कलम ३७० तिथल्या ४५ हजार लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, जे मोदी सरकारने उखडून टाकले आहे. यावेळी शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंमुळे पाकव्याप्त काश्मीरची सर्वात पहिली समस्या सर्वप्रथम उद्भवली. संपूर्ण काश्मीर आपल्या हातात न येता युद्धबंदी लागू केली गेली, अन्यथा तो भाग काश्मीरचाच राहिला असता. शहा यांच्या या विधानावर सभागृहात गदारोळ झाला, त्यानंतर विरोधकांनी लोकसभेतून वॉकआउट केला.

यावेळी बोलताना शाह म्हणाले की, विधेयकाच्या नावाशी आदर आहे, फक्त तेच लोक ते पाहू शकतात, ज्यांना मागे राहिलेल्यांचे बोट धरून त्यांना सहानुभूतीने पुढे जायचे आहे. ते लोक हे समजू शकत नाहीत, जे त्याचा वापर व्होट बँकेसाठी करतात.

'कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज'

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी हे असे नेते आहेत, ज्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि ते देशाचे पंतप्रधान झाले आहेत, त्यांना मागासलेल्या लोकांच्या वेदना माहीत आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले आहेत. ३७० हटवल्याने काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहू लागतील, रक्ताच्या नद्या सोडा, दगडफेक करण्याची कोणाची हिंमत नव्हती, असे अमित शहा म्हणाले.

शाह म्हणाले, कलम ३७० आधीच हटवायला हवे होते. १९८० नंतर दहशतवादाचे युग आले आणि ते अतिशय भयावह दृश्य होते. जे लोक या भूमीला आपला देश मानून राहात होते, त्यांना हाकलून दिले गेले आणि त्यांची कोणी पर्वा केली नाही. ते थांबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते लोक इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते. काश्मिरी पंडित विस्थापित झाले तेव्हा त्यांना त्यांच्याच देशात निर्वासित म्हणून जगण्यास भाग पाडले गेले. सध्याच्या आकडेवारीनुसार, सुमारे ४६,६३१ कुटुंबे आणि १,५७,९६८ लोक त्यांच्याच देशात विस्थापित झाले आहेत. हे विधेयक त्यांना अधिकार देण्यासाठी आहे, हे विधेयक त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे, असे अमित शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपा