शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
8
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
9
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
10
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
11
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
12
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
13
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
14
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
15
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
16
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
17
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
18
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
19
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
20
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!

ती एक घोडचूक! नेहरूंनी योग्य निर्णय घेतला असता तर Pok भारताचा भाग असता - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:37 IST

आज लोकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, जम्मू काश्मिरमधील कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले.

गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन नवीन विधेयकांवर चर्चा केली. यावर बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. आपल्या भाषणात शाह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले आहेत. 'जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती कायदा २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक २०२३ ही सत्तर वर्षांपासून अन्याय, अपमान आणि दुर्लक्ष झालेल्यांना न्याय देण्यासाठी विधेयके आहेत. 

शाह म्हणाले की, कलम ३७० तिथल्या ४५ हजार लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, जे मोदी सरकारने उखडून टाकले आहे. यावेळी शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंमुळे पाकव्याप्त काश्मीरची सर्वात पहिली समस्या सर्वप्रथम उद्भवली. संपूर्ण काश्मीर आपल्या हातात न येता युद्धबंदी लागू केली गेली, अन्यथा तो भाग काश्मीरचाच राहिला असता. शहा यांच्या या विधानावर सभागृहात गदारोळ झाला, त्यानंतर विरोधकांनी लोकसभेतून वॉकआउट केला.

यावेळी बोलताना शाह म्हणाले की, विधेयकाच्या नावाशी आदर आहे, फक्त तेच लोक ते पाहू शकतात, ज्यांना मागे राहिलेल्यांचे बोट धरून त्यांना सहानुभूतीने पुढे जायचे आहे. ते लोक हे समजू शकत नाहीत, जे त्याचा वापर व्होट बँकेसाठी करतात.

'कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज'

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी हे असे नेते आहेत, ज्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि ते देशाचे पंतप्रधान झाले आहेत, त्यांना मागासलेल्या लोकांच्या वेदना माहीत आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले आहेत. ३७० हटवल्याने काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहू लागतील, रक्ताच्या नद्या सोडा, दगडफेक करण्याची कोणाची हिंमत नव्हती, असे अमित शहा म्हणाले.

शाह म्हणाले, कलम ३७० आधीच हटवायला हवे होते. १९८० नंतर दहशतवादाचे युग आले आणि ते अतिशय भयावह दृश्य होते. जे लोक या भूमीला आपला देश मानून राहात होते, त्यांना हाकलून दिले गेले आणि त्यांची कोणी पर्वा केली नाही. ते थांबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते लोक इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते. काश्मिरी पंडित विस्थापित झाले तेव्हा त्यांना त्यांच्याच देशात निर्वासित म्हणून जगण्यास भाग पाडले गेले. सध्याच्या आकडेवारीनुसार, सुमारे ४६,६३१ कुटुंबे आणि १,५७,९६८ लोक त्यांच्याच देशात विस्थापित झाले आहेत. हे विधेयक त्यांना अधिकार देण्यासाठी आहे, हे विधेयक त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे, असे अमित शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपा