शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तेव्हा वाटलं होतं सगळं संपलं, विमान बिघाडावर राहुल गांधींनी पहिल्यांदाच केले भाष्य   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:43 IST

निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना विमानात झालेल्या संशयास्पद बिघाडादरम्यान आलेला अनुभव राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडला. त्यावेळी ते म्हणाले...

नवी दिल्ली  -  दोन तीन दिवसांपूर्वी आम्ही कर्नाटकमध्ये जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला. मला वाटलं सगळं संपलं. पण तेवढ्यात मी कैलास मानसरोवर यात्रा करेन असा विचार मनात आला, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना विमानात झालेल्या संशयास्पद बिघाडादरम्यान आलेला अनुभव आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडला. काँग्रेसने दिल्लीत आयोजित केलेल्या जनआक्रोष मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. यावेळीच त्यांनी आपल्या विमानात संशयास्पदपणे झालेल्या बिघाडाचाही उल्लेख केला.  खरंतर राहुल गांधी आपले भाषण पूर्ण करून जागेवर बसले होते. मात्र काही वेळातच ते पुन्हा उभे राहिले. त्यावेळी ते म्हणाले, " तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात.  मला तुम्हाला एका गोष्ट सांगायची आहे. खरंतर ही गोष्ट सांगायची नव्हती, पण मग विचार केला तुम्ही आपलीच माणसं आहात. म्हणून सांगतो. तुम्हा माहीतच असेल दोन तीन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला होता. मला वाटलं सगळं संपलं. पण तेवढ्यात मी कैलास मानसरोवर यात्रा करेन असा विचार मनात आला. आता कर्नाटकचा निकाल 12 मे रोजी आहे. त्यानंतर पुढचे 10-15 दिवस तुम्ही मला सुट्टी द्या. म्हणजे मी कैलास आणि मानसरोवराची तीर्थ यात्रा करून येईन."  दरम्यान, आज झालेल्या जनआक्रोष सभेत  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. डोकलाम, शेतकऱ्यांचं कर्ज, भ्रष्टाचार, न्यायालयातील 4 न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद या मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधलं. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन न्याय मागावा लागतो. मात्र तरीही मोदी मूग मिळून गप्प बसतात, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.  राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका करत 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल फुंकलं. भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा, बँक घोटाळे, राफेल करार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी शांत का बसतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश रॅलीला ते संबोधित करत होते. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ही राहुल यांची दिल्लीतील पहिलीच रॅली होती. कर्नाटकची निवडणूक जवळ आली असताना राहुल गांधींनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 'आतापासून येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस जिंकेल आणि 2019 मध्ये ताकद दाखवून देईल,' असं राहुल यांनी म्हटलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८