शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 05:40 IST

पाकिस्तानने हल्ला करण्यासाठी वापरलेले ड्रोन तसेच अन्य प्रणालींना भारतीय लष्कराने निष्प्रभ केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकता येणार नाहीत. त्यामुळे भविष्यातील युद्धांसाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वदेशात शस्त्रास्त्र निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी सांगितले. 

‘विदेशी कंपन्यांकडून सध्या आयात होणाऱ्या यूएव्ही व अन्य प्रणालीतील महत्त्वाच्या घटकांची स्वदेशात निर्मिती’ या विषयावर दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, सध्या होणाऱ्या युद्धात कालच्या शस्त्रांनी विजय मिळवता येत नाही. आजचे युद्ध उद्याच्या तंत्रज्ञानाने लढावे लागते. आपला भूप्रदेश व गरजांनुसार तयार केलेली स्वदेशी मानवविरहित विमान प्रणाली (यूएव्ही) व अन्य प्रणाली किती महत्त्वाच्या आहेत हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे. पाकिस्तानने हल्ला करण्यासाठी वापरलेले ड्रोन तसेच अन्य प्रणालींना भारतीय लष्कराने निष्प्रभ केले. (वृत्तसंस्था)

युद्धात वाढले ड्रोन; शस्त्रास्त्र परदेशी नको, स्वदेशीच हवेजनरल चौहान म्हणाले की, ड्रोन युद्धामुळे अन्य युद्धसामग्रीच्या वापराबाबतही काही प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे मानवरहित विमानांचा होणारा विकास, त्या अनुषंगाने रणनीतीत होणारे बदल युद्ध लढताना विचारात घ्यावे लागतील.

आधुनिक तंत्रज्ञानासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा या प्रणाली विकसित कराव्या लागतील. विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपल्या युद्धसज्जतेत कमतरता निर्माण होते. परदेशी शस्त्रास्त्र, तंत्रज्ञान याची सर्वांनाच माहिती असल्याने शत्रू आपल्या रणनीतीतील बारकावे सहजी ओळखू शकतो. त्यामुळे स्वदेशात शस्त्रास्त्र निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे. चौहान म्हणाले की, ड्रोनचा अलीकडील युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यांचा आकार, त्यांची किंमत यांचा योग्य ताळमेळ घालून ड्रोनची निर्मिती होत असून त्यांची युद्धात उपयुक्तताही वाढली आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान