शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
4
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
5
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
6
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
7
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
8
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
9
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
10
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
11
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
12
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
13
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
14
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
15
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
16
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
17
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
18
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
19
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
20
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 05:40 IST

पाकिस्तानने हल्ला करण्यासाठी वापरलेले ड्रोन तसेच अन्य प्रणालींना भारतीय लष्कराने निष्प्रभ केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकता येणार नाहीत. त्यामुळे भविष्यातील युद्धांसाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वदेशात शस्त्रास्त्र निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी सांगितले. 

‘विदेशी कंपन्यांकडून सध्या आयात होणाऱ्या यूएव्ही व अन्य प्रणालीतील महत्त्वाच्या घटकांची स्वदेशात निर्मिती’ या विषयावर दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, सध्या होणाऱ्या युद्धात कालच्या शस्त्रांनी विजय मिळवता येत नाही. आजचे युद्ध उद्याच्या तंत्रज्ञानाने लढावे लागते. आपला भूप्रदेश व गरजांनुसार तयार केलेली स्वदेशी मानवविरहित विमान प्रणाली (यूएव्ही) व अन्य प्रणाली किती महत्त्वाच्या आहेत हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे. पाकिस्तानने हल्ला करण्यासाठी वापरलेले ड्रोन तसेच अन्य प्रणालींना भारतीय लष्कराने निष्प्रभ केले. (वृत्तसंस्था)

युद्धात वाढले ड्रोन; शस्त्रास्त्र परदेशी नको, स्वदेशीच हवेजनरल चौहान म्हणाले की, ड्रोन युद्धामुळे अन्य युद्धसामग्रीच्या वापराबाबतही काही प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे मानवरहित विमानांचा होणारा विकास, त्या अनुषंगाने रणनीतीत होणारे बदल युद्ध लढताना विचारात घ्यावे लागतील.

आधुनिक तंत्रज्ञानासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा या प्रणाली विकसित कराव्या लागतील. विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपल्या युद्धसज्जतेत कमतरता निर्माण होते. परदेशी शस्त्रास्त्र, तंत्रज्ञान याची सर्वांनाच माहिती असल्याने शत्रू आपल्या रणनीतीतील बारकावे सहजी ओळखू शकतो. त्यामुळे स्वदेशात शस्त्रास्त्र निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे. चौहान म्हणाले की, ड्रोनचा अलीकडील युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यांचा आकार, त्यांची किंमत यांचा योग्य ताळमेळ घालून ड्रोनची निर्मिती होत असून त्यांची युद्धात उपयुक्तताही वाढली आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान