शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"मनमोहन सिंग यांचा हयातीत कधीही आदर न करणारी काँग्रेस आता मृत्यूनंतरही..."; भाजपा नेत्याने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:14 IST

BJP vs Congress, Dr. Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले

BJP vs Congress, Dr. Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते. भारतीय अर्थक्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या समाधीसाठी जागा देण्याची मागणी केली होती. त्यावरून काही अंशी वादविवाद सुरु आहेत. या साऱ्या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसला सुनावले.

सुधांशू त्रिवेदी म्हणाला, "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशाच्या आर्थिक विकासाचा पाया रचणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना योग्य तो सन्मान देण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने काल झालेल्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक आणि समाधी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला किती वेळ लागेल, हे काँग्रेस पक्षाला सांगण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना माहिती दिली."

"सरकारने स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आता भूसंपादन ट्रस्ट आणि जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती वेळात हे काम केले जाईल याचा अंदाज देण्यात आला आहे. ज्या काँग्रेस पक्षाने डॉ. मनमोहन सिंग यांचा त्यांच्या हयातीत कधीही सन्मान केला नाही, ते काँग्रेस आज त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या संदर्भात राजकारण करत आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. डॉ. मनमोहन सिंग गांधी हे नेहरू कुटुंबाबाहेरचे पहिले पंतप्रधान होते, ज्यांनी १० वर्षे पंतप्रधानपद भूषवले. काँग्रेस पक्षाने नेहरू-गांधी घराण्याबाहेरील कोणत्याही पंतप्रधानाला आदर दिला नाही," असे त्रिवेदी यांनी सुनावले.

"आमच्या सरकारचा विचार करता पंतप्रधान मोदींच्या सरकारने पक्षीय भावनांच्या पुढे जात सर्व नेत्यांचा आदर केला आहे. डॉ. मनमोहन सिंग जी यांना त्यांच्या कार्यकाळात ज्या प्रकारे वागणूक मिळाली, ते देशाने पाहिले आहे. निदान आज तरी या दु:खाच्या काळात राजकारण करणे थांबवले पाहिजे," असे ते म्हणाले.

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपा