शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"मनमोहन सिंग यांचा हयातीत कधीही आदर न करणारी काँग्रेस आता मृत्यूनंतरही..."; भाजपा नेत्याने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:14 IST

BJP vs Congress, Dr. Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले

BJP vs Congress, Dr. Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते. भारतीय अर्थक्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या समाधीसाठी जागा देण्याची मागणी केली होती. त्यावरून काही अंशी वादविवाद सुरु आहेत. या साऱ्या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसला सुनावले.

सुधांशू त्रिवेदी म्हणाला, "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशाच्या आर्थिक विकासाचा पाया रचणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना योग्य तो सन्मान देण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने काल झालेल्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक आणि समाधी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला किती वेळ लागेल, हे काँग्रेस पक्षाला सांगण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना माहिती दिली."

"सरकारने स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आता भूसंपादन ट्रस्ट आणि जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती वेळात हे काम केले जाईल याचा अंदाज देण्यात आला आहे. ज्या काँग्रेस पक्षाने डॉ. मनमोहन सिंग यांचा त्यांच्या हयातीत कधीही सन्मान केला नाही, ते काँग्रेस आज त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या संदर्भात राजकारण करत आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. डॉ. मनमोहन सिंग गांधी हे नेहरू कुटुंबाबाहेरचे पहिले पंतप्रधान होते, ज्यांनी १० वर्षे पंतप्रधानपद भूषवले. काँग्रेस पक्षाने नेहरू-गांधी घराण्याबाहेरील कोणत्याही पंतप्रधानाला आदर दिला नाही," असे त्रिवेदी यांनी सुनावले.

"आमच्या सरकारचा विचार करता पंतप्रधान मोदींच्या सरकारने पक्षीय भावनांच्या पुढे जात सर्व नेत्यांचा आदर केला आहे. डॉ. मनमोहन सिंग जी यांना त्यांच्या कार्यकाळात ज्या प्रकारे वागणूक मिळाली, ते देशाने पाहिले आहे. निदान आज तरी या दु:खाच्या काळात राजकारण करणे थांबवले पाहिजे," असे ते म्हणाले.

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपा