शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

"मनमोहन सिंग यांचा हयातीत कधीही आदर न करणारी काँग्रेस आता मृत्यूनंतरही..."; भाजपा नेत्याने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:14 IST

BJP vs Congress, Dr. Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले

BJP vs Congress, Dr. Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते. भारतीय अर्थक्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या समाधीसाठी जागा देण्याची मागणी केली होती. त्यावरून काही अंशी वादविवाद सुरु आहेत. या साऱ्या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसला सुनावले.

सुधांशू त्रिवेदी म्हणाला, "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशाच्या आर्थिक विकासाचा पाया रचणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना योग्य तो सन्मान देण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने काल झालेल्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक आणि समाधी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला किती वेळ लागेल, हे काँग्रेस पक्षाला सांगण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना माहिती दिली."

"सरकारने स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आता भूसंपादन ट्रस्ट आणि जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती वेळात हे काम केले जाईल याचा अंदाज देण्यात आला आहे. ज्या काँग्रेस पक्षाने डॉ. मनमोहन सिंग यांचा त्यांच्या हयातीत कधीही सन्मान केला नाही, ते काँग्रेस आज त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या संदर्भात राजकारण करत आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. डॉ. मनमोहन सिंग गांधी हे नेहरू कुटुंबाबाहेरचे पहिले पंतप्रधान होते, ज्यांनी १० वर्षे पंतप्रधानपद भूषवले. काँग्रेस पक्षाने नेहरू-गांधी घराण्याबाहेरील कोणत्याही पंतप्रधानाला आदर दिला नाही," असे त्रिवेदी यांनी सुनावले.

"आमच्या सरकारचा विचार करता पंतप्रधान मोदींच्या सरकारने पक्षीय भावनांच्या पुढे जात सर्व नेत्यांचा आदर केला आहे. डॉ. मनमोहन सिंग जी यांना त्यांच्या कार्यकाळात ज्या प्रकारे वागणूक मिळाली, ते देशाने पाहिले आहे. निदान आज तरी या दु:खाच्या काळात राजकारण करणे थांबवले पाहिजे," असे ते म्हणाले.

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपा