शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

भारतात आता व्यवसाय करणे अधिक सुलभ, पंतप्रधान मोदी यांचा दावा, वर्ल्ड फूड इंडियाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:46 AM

भारतात आता व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले आहे. आताच्या इतकी व्यवसाय सुलभता भारतात यापूर्वी कधीच नव्हती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.

नवी दिल्ली : भारतात आता व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले आहे. आताच्या इतकी व्यवसाय सुलभता भारतात यापूर्वी कधीच नव्हती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.‘वर्ल्ड फूड इंडिया’ परिषदेला शुक्रवारी येथे थाटात प्रारंभ झाला. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात मोदी बोलत होते. ही परिषद तीन दिवस चालणार असून, खाद्य क्षेत्रातील जगभरातील कंपन्यांना परिषदेसाठी निमंत्रित केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून विदेशी गुंतवणूक आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.जागतिक बँकेने जारी केलेल्या व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने ३0 स्थानांची प्रगती करून १00 व्या स्थानी झेप घेतली आहे. यापूर्वी भारत १३0 व्या स्थानी होता. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी वरील वक्तव्य केले. याप्रसंगी मोदी यांनी जागतिक कंपन्यांना भारतात अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले. या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत, असे ते म्हणाले. कंत्राटी शेती, कच्चा माल पुरवठा आणि कृषी जोडणी या क्षेत्रातही अधिक गुंतवणुकीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, ज्याला आम्ही आदराने अन्नदाता म्हणतो तो शेतकरीच आमच्या अन्नप्रक्रिया क्षेत्राचा केंद्रबिंदू आहे. त्याअनुषंगाने आम्ही हे क्षेत्र पुढे नेऊ इच्छितो. या क्षेत्रातील हंगामोत्तर व्यवस्थापनात भरपूर संधी आहेत.सेंद्रीय अन्न क्षेत्रात मूल्यवर्धनास भरपूर वाव आहे. शेतकºयांचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आपल्या सरकारने ठेवले आहे. पारंपरिक भारतीय खाद्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समसमान पातळीवर मेळ घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारत हा जगातील सर्वाधिक गतीने वाढणाºया अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. जीएसटीने विविध कर संपवून एकच एक कर ठेवला आहे, असेही मोदी यांनी सांगितले.जपानच्या ६0 कंपन्या‘वर्ल्ड फूड इंडिया’ परिषदेत जपानच्या ६0 कंपन्या आणि बड्या कंपन्यांचे १२ सीईओ सहभागी होत आहेत. जपानचे राजदूत केंजी हिरामात्सु यांनी जपानी दूतावासात आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभात ही माहिती दिली.११ कंपन्यांचे प्रतिनिधी स्वागत समारंभाला उपस्थित होते. या परिषदेचा भारत आणि जपान या दोन्ही देशांना लाभ होईल तसेच भारतात जपानी गुंतवणूक आणण्यास ही परिषद साह्यभूत होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी