शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

हमासवर बंदी घालण्यास भारताचा नकार, अब्जो डॉलर्सच्या व्यापारावर होऊ शकतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 18:22 IST

अमेरिका-जर्मनीने हमासवर बंदी घातली आहे, शिवाय अनेक देश हमासच्या विरोधात आहेत.

Israel VS Hamas: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगभरात दोन गट पडले आहेत. एक गट इस्रायलचे समर्थन करत आहे, तर दुसरा गट पॅलेस्टानचे समर्थन करत आहे. जगभरातून हमासवर कारवाईची मागणीही होत आहे. अमेरिका आणि जर्मनी हमासला दहशतवादी संघटना मानतात आणि दोन्ही देशांनी त्यावर बंदी घातली आहे.

भारतानेही हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, अशी मागणी इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी केली होती. पण, भारताने हमासवर अद्याप बंदी घालणार नसल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या हमास भारतात सक्रिय नाही, त्यामुळे त्यावर बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ग्रहमंत्रालयाचे म्हणने आहे. सरकारने असे केल्यास अरब देशांशी भारताचे संबंध बिघडू शकतात, अशीही भीती सरकारला आहे. त्यामुळे सध्या या संघटनेवर भारतात बंदी घातली गेली नाही. 

कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय यूएपीए कायद्यानुसार गृह मंत्रालय घेते. फेब्रुवारी 2023 पर्यंत UAPA यादीमध्ये 44 संघटनांचा समावेश होता, ज्यांना भारत दहशतवादी संघटना मानतो. भारताने 2015 मध्ये ISIS ला दहशतवादी संघटना घोषित केले होते. या यादीत एखाद्या संस्थेचा समावेश करणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. भविष्यात भारत हमासबाबत निर्णय घेईल, अशी शक्यता आहे, परंतु सध्या तसा निर्णय घेतलेला नाही. 

इस्रायलवर भारताची अधिकृत प्रतिक्रिया7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर संघटनेवर टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. संकटकाळात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा आहे, असे पीएम मोदी म्हणाले होते. या संपूर्ण वक्तव्यात त्यांनी हमासचा कुठेही उल्लेख केला नाही. याशिवाय, 14 ऑक्टोबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाने हमास हल्ल्याचे वर्णन दहशतवादी हल्ला, असे केले. मात्र, हमासवर त्यांनी काहीही न बोलता पॅलेस्टाईन वेगळा देश असावा, या भारताच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

भारत अरब देशांशी संबंध बिघडवू इच्छित नाहीमध्यपूर्वेतील 22 देशांपैकी (अरब देश), सौदी अरेबिया, UAE आणि इराक हे भारताचे प्रमुख तेल पुरवठादार आहेत. भारताने 2020-21 मध्ये गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) (ज्यात कुवेत, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान आणि UAE समाविष्ट आहे) सोबत 90 अब्ज डॉलरचा व्यापार केला. याशिवाय भारताला परकीय चलनाचा मोठा हिस्सा येथून मिळतो.

आखाती देशांसोबत व्यापारी संबधकोरोनाच्या कालावधीपूर्वी 2019-20 मध्ये आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी देशात 6.38 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवली होती. यातील 53% फक्त 5 आखाती देश - UAE, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि ओमानमधून भारतात आला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE, सौदी अरेबिया आणि कतार हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. एवढेच नाही तर UAE हे भारतासाठी अमेरिकेनंतरचे दुसरे सर्वात मोठे व्यापारी ठिकाण आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIndiaभारतIsraelइस्रायलwarयुद्धbusinessव्यवसाय