शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:17 IST

या दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने मध्यस्थ म्हणून काम केले जाऊ शकते. लाखो भारतीय पश्चिम आशियात राहत आहेत असं सोनिया गांधींनी म्हटलं.

नवी दिल्ली - सध्या मध्य पूर्वेत इराण आणि इस्त्रायल युद्धामुळे तणाव शिगेला पोहचला आहे. त्यात या युद्धात अमेरिकेसोबतच चीन, रशियानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनीही या युद्धावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जाते. इराण-इस्त्रायल युद्धात भारताची भूमिका अस्पष्ट असल्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. इराण भारताचा जुना मित्र आहे. आपले खूप चांगले संबंध आहेत. जम्मू काश्मीरसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर इराणने भारताची साथ दिल्याचा इतिहास आहे असं सांगत सोनिया गांधींनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यात त्या म्हणाल्या की, १९९४ साली इराणने काश्मीर मुद्द्यावर मानवाधिकार विषयावर संयुक्त राष्ट्र आयोगात भारताची टीका करणारा प्रस्ताव रोखण्यास मदत केली होती. भारत आणि इस्त्रायल यांच्यात अलीकडच्या काळात राजनैतिक संबंध विकसित झाले आहेत. या दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने मध्यस्थ म्हणून काम केले जाऊ शकते. लाखो भारतीय पश्चिम आशियात राहत आहेत, तिथे काम करतायेत. त्यामुळे या भागातील शांतता राखणे हे राष्ट्रीय हिताचे आहे असं त्यांनी सांगितले. 

पॅलेस्टाईनबाबत सरकारच्या भूमिकेवर टीका

या मानवी आपत्तीला तोंड देताना मोदी सरकारने शांततापूर्ण द्वि-राज्य उपायासाठी भारताची दीर्घकालीन आणि तत्वनिष्ठ वचनबद्धता सोडून दिली आहे, ज्यामध्ये परस्पर सुरक्षितता आणि आदराने इस्रायलच्या शेजारी राहणाऱ्या सार्वभौम, स्वतंत्र पॅलेस्टाईनची कल्पना आहे असं सांगत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. 

आताही फार उशीर झाला नाही 

गाझामधील विध्वंस आणि आता इराणविरुद्ध विनाकारण सुरू असणारा तणाव यावर भारताचे मौन हे आपल्या नैतिक आणि राजनैतिक परंपरेपासून दूर जाणे आहे. अजून उशीर झालेला नाही. भारताने स्पष्टपणे बोलले पाहिजे, जबाबदारीने वागले पाहिजे आणि पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी आणि संवादाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक राजनैतिक माध्यमाचा वापर केला पाहिजे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीIranइराणIsraelइस्रायलIndiaभारत