शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:17 IST

या दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने मध्यस्थ म्हणून काम केले जाऊ शकते. लाखो भारतीय पश्चिम आशियात राहत आहेत असं सोनिया गांधींनी म्हटलं.

नवी दिल्ली - सध्या मध्य पूर्वेत इराण आणि इस्त्रायल युद्धामुळे तणाव शिगेला पोहचला आहे. त्यात या युद्धात अमेरिकेसोबतच चीन, रशियानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनीही या युद्धावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जाते. इराण-इस्त्रायल युद्धात भारताची भूमिका अस्पष्ट असल्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. इराण भारताचा जुना मित्र आहे. आपले खूप चांगले संबंध आहेत. जम्मू काश्मीरसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर इराणने भारताची साथ दिल्याचा इतिहास आहे असं सांगत सोनिया गांधींनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यात त्या म्हणाल्या की, १९९४ साली इराणने काश्मीर मुद्द्यावर मानवाधिकार विषयावर संयुक्त राष्ट्र आयोगात भारताची टीका करणारा प्रस्ताव रोखण्यास मदत केली होती. भारत आणि इस्त्रायल यांच्यात अलीकडच्या काळात राजनैतिक संबंध विकसित झाले आहेत. या दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने मध्यस्थ म्हणून काम केले जाऊ शकते. लाखो भारतीय पश्चिम आशियात राहत आहेत, तिथे काम करतायेत. त्यामुळे या भागातील शांतता राखणे हे राष्ट्रीय हिताचे आहे असं त्यांनी सांगितले. 

पॅलेस्टाईनबाबत सरकारच्या भूमिकेवर टीका

या मानवी आपत्तीला तोंड देताना मोदी सरकारने शांततापूर्ण द्वि-राज्य उपायासाठी भारताची दीर्घकालीन आणि तत्वनिष्ठ वचनबद्धता सोडून दिली आहे, ज्यामध्ये परस्पर सुरक्षितता आणि आदराने इस्रायलच्या शेजारी राहणाऱ्या सार्वभौम, स्वतंत्र पॅलेस्टाईनची कल्पना आहे असं सांगत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. 

आताही फार उशीर झाला नाही 

गाझामधील विध्वंस आणि आता इराणविरुद्ध विनाकारण सुरू असणारा तणाव यावर भारताचे मौन हे आपल्या नैतिक आणि राजनैतिक परंपरेपासून दूर जाणे आहे. अजून उशीर झालेला नाही. भारताने स्पष्टपणे बोलले पाहिजे, जबाबदारीने वागले पाहिजे आणि पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी आणि संवादाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक राजनैतिक माध्यमाचा वापर केला पाहिजे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीIranइराणIsraelइस्रायलIndiaभारत