शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

करून दाखवलं! वडिलांचं छत्र हरपलं पण 'तो' खचला नाही; मेहनतीने पूर्ण केलं IPS होण्याचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 12:01 IST

राजेंद्र आणि त्यांच्या भावंडांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. गरीब शेतकरी कुटुंब वडिलांच्या निधनाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण या कठीण काळात त्यांच्या मोठ्या भावांनी त्यांना साथ दिली.

आयपीएस अधिकारी राजेंद्र प्रसाद मीणा य़ांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे.  राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील जाखोडा गावचे ते रहिवासी आहेत. त्यांचं बालपण खूप संघर्षात गेलं. राजेंद्र हे पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होते आणि लहानपणापासूनच त्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा होती, पण एक दिवस त्याच्या आयुष्यात असा क्षण आला ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. वडिलांचं एका अपघातात निधन झालं. 

राजेंद्र आणि त्यांच्या भावंडांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. गरीब शेतकरी कुटुंब वडिलांच्या निधनाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण या कठीण काळात त्यांच्या मोठ्या भावांनी त्यांना साथ दिली. त्यांचे थोरले भाऊ हरिकेश, भरतलाल, ओमप्रकाश यांनी शेती सांभाळली. आपल्या धाकट्या भाऊ-बहिणीच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हरिकेश आपल्या अभ्यासासोबतच शेतीत पूर्णपणे गुंतला, तर भरत लाल आणि ओमप्रकाश यांनी शेतीत मदत करण्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारीही सुरू ठेवली. 

वडिलांच्या निधनानंतर अगदी एक वर्षानंतर राजेंद्र प्रसाद यांची दहावीच्या बोर्डाची परीक्षा होती. कुटुंब उद्ध्वस्त झालं पण हिंमत हारली नाही आणि दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. या काळात मोठा भाऊ हरिकेश पूर्णपणे शेती सांभाळू लागला, तर भरतलाल आणि ओमप्रकाश हे सरकारी शिक्षक झाले होते. करौली येथून बी.कॉम केल्यानंतर, राजेंद्रच्या मनात विचार आला की, जर आपल्याला अधिकारी व्हायचे असेल तर आपल्याला जयपूरला जावे लागेल कारण त्यांचे सर्व शाळेतील वरिष्ठ आणि ओळखीचे लोक नागरी सेवांच्या तयारीसाठी जयपूरला गेले होते. 

राजस्थान युनिव्हर्सिटी, जयपूरमधून एम.कॉम केल्यानंतर, 1992 मध्ये त्यांची ज्युनिअर रिसर्च फेलोशिपमध्ये निवड झाली आणि अभ्यास आणि इतर खर्चासोबत त्यांना दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळू लागली. यामुळे त्याला धीर आला आणि 1995 मध्ये राजेंद्र यांनी ज्युनिअर अकाऊंटेंट परीक्षा उत्तीर्ण केली आणि कोटा येथील एसपी ग्रामीण कार्यालयात नोकरीवर रुजू झाले.

एसपी कार्यालयात काम करत असताना त्यांच्या मनात स्वत: एसपी होण्याची इच्छा जागृत झाली होती. फक्त एक वर्षानंतर, 1996 मध्ये, RPSC ची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, राजेंद्र कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर झाले, पण राजेंद्र यांचे ध्येय अजून साध्य झाले नाही. राजेंद्र यांनी DANIPS (दिल्ली, अंदमान आणि निकोबार आयलंड पोलिस सर्व्हिस) परीक्षा उत्तीर्ण केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, 2001 मध्ये, ते दिल्लीत एसीपी म्हणजेच अस्सिटेंट कमिश्नर ऑफ पोलीस झाले.

पोलीस सेवेत रुजू होऊनही राजेंद्रचा थांबले नाहीत. वर्ष 2022 मध्ये डीसीपीची जबाबदारी स्वीकारताना त्यांच्या अनेक वर्षांच्या स्वच्छ रेकॉर्डनंतर त्यांची निवड करण्यात आली आणि उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकासाठी गौरविण्यात आले. राजेंद्र यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा पदक देण्यात आले. त्याच वर्षी, चांगला सेवा रेकॉर्ड लक्षात घेऊन, त्यांना DANIPS वरून IPS म्हणून बढती देण्यात आली.

राजेंद्र प्रसाद मीणा सांगतात की आयुष्यात अनेक वेळा वाईट प्रसंग येतात पण अशा वेळी हिंमत हारता कामा नये कारण आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीत मेहनत माणसाला ध्येयापर्यंत घेऊन जाते. आज राजेंद्र प्रसाद मीणा राजस्थानच्या तरुणांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशातील तरुणांसाठी आदर्श बनले आहेत. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी