शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या वैमानिकांचे 'बुरे दिन'; मोदी सरकारला पत्र लिहून सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 13:40 IST

एअर इंडियाचं भविष्य अंधारात असल्यानं वैमानिक आर्थिक विवंचनेत

नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाच्या वैमानिकांनी आता थेट मोदी सरकारला पत्र लिहून त्यांची व्यथा मांडली आहे. नोटीस पीरियड संपवण्याची आणि थकीत वेतन देण्याची मागणी वैमानिकांकडून करण्यात आली आहे. एअर इंडियाचं भविष्य अंधारात असल्यानं वैमानिक काम करण्याच्या स्थितीत नसल्याचं इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशननं (आयसीपीए) पत्रात नमूद केलं आहे.आयसीपीएनं नागरी उड्डाण राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनादेखील पत्र पाठवून त्यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. '३१ मार्च २०२० पर्यंत एअर इंडियाचं खासगीकरण न झाल्यास ही कंपनी बंद होईल, हे तुमचं विधान अतिशय चिंताजनक आहे,' असं आयसीपीएनं पत्रात म्हटलं आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांना देण्यात येणारी वेठबिगारासारखी वागणूक बंद करावी, अशी मागणीदेखील पत्रातून करण्यात आली आहे. 'वैमानिकांना वेठबिगारासारखं वागवणं बंद करा. त्यांना किमान नोटीस पीरियड न देता एअर इंडिया सोडण्याची परवानगी द्या. याशिवाय त्यांचं रखडलेलं वेतनदेखील लवकरात लवकर द्या,' अशा मागण्या पत्रातून करण्यात आल्या आहेत. वेतन वेळेवर मिळत नसल्यानं अनेक कर्मचारी ईएमआयदेखील भरू शकत नसल्याचं युनियननं म्हटलं आहे. उड्डाण भत्ता मिळत नसल्यानं प्रचंड नुकसान होत आहे. कारण हा भत्ता वैमानिकांच्या एकूण वेतनाच्या ७० टक्के इतका असतो, असंदेखील आयसीपीएनं पत्रात नमूद केलं आहे. जवळपास ८०० वैमानिक या संघटनेचे सदस्य आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAir Indiaएअर इंडिया