शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कोरोनाला निमंत्रण? गाव हॉटस्पॉट आणि खासदार पुत्राचे धुमधडाक्यात लग्न; उत्तरप्रदेशात नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 14:04 IST

CoronaVirus कोरोनामुळे कोंचच्या एसडीएम अशोक कुमार यांनी 12 जूनला पत्रक काढून लग्न सोहळ्याला केवळ 5 लोकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते.

जालौन : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला न जाता कर्तव्य पार पाडले म्हणून स्तुती केली होती. तर दुसरीकडे जालौन जिल्ह्यात रविवारी भाजपाचे खासदार भानू प्रताप वर्मा यांनी मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावले आहे. या विवाहसोहळ्यामध्ये सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पायदळी तुडविण्यात आले. धक्कादायक म्हणजे विवाह सोहळा असलेले ठिकाण हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले आहे.

कोरोनामुळे कोंचच्या एसडीएम अशोक कुमार यांनी 12 जूनला पत्रक काढून लग्न सोहळ्याला केवळ 5 लोकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते. आता भानू प्रताप वर्मा यांच्या या लग्नसोहळ्याने राज्यातील राजकारण तापू लागले आहे. यावर एसडीएम यांनी सांगितले की, खासदारांनी किती लोकांची परवानगी घेतली होती, याचा तपास केला जाईल. त्यानंतर अधिकृतपणे सांगता येईल. 

जालौन-भोगनीपूर-गरौठा येथून लोकसभेवर गेलेले भानु प्रताप वर्मा यांचे कोंचमध्ये घर आहे. रविवारी रात्री त्यांनी मुलगा महेंद्र याचे लग्न लावून दिले. यावेळी लग्नामध्ये लोक मास्क न वापरता वावरत होते. सोशल डिस्टंन्सिंगचीही काळजी घेतली गेली नाही. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लग्नामध्ये 50 हून अधिक लोक सहभागी होऊ शकत नाहीत. मात्र, या लग्नसोहळ्याला त्याहून खूप जास्त लोक सहभागी झाले होते. 

जालौन जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 168 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. 113 जण बरे झाले असून 48 जणांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 33 जण हे खासदारांचे घर असलेल्या कोंचमधील आहेत. यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांनी या भागात लग्न सोहळ्याला केवळ वधुवराव्यतिरिक्त 5 जणांना परवानगी दिली होती. 

कुमारस्वामींनीही तोडलेले लॉकडाऊनचे नियमकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्नही असेच एप्रिलमध्ये थाटामाटात लावून देण्यात आले होते. यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले होते. तेव्हा अशा सोहळ्यांना परवानगीही नसताना सरकारकडून २१ कारना येण्याजाण्याची परवानगी देण्यात आली असल्याचा दावा कुमारस्वामींनी केला होता. निखिलचे लग्न हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसोहळा फार्महाऊसवर झाला, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले होते.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

India China FaceOff: चीनच्या तंबूला अचानक आग लागली, अन् भारतीय जवान भडकले; व्ही के सिंहांचा गौप्यस्फोट

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश