शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लैंगिक छळाच्या प्रकरणांची चार आठवड्यांत चौकशी करा, केंद्रीय क्रीडामंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 03:53 IST

एसएआयच्या केंद्रांमध्ये घडलेल्या लैंगिक छळाच्या ४५ पैकी २९ घटनांत प्रशिक्षकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (एसएआय) २४ केंद्रांमध्ये २०१० ते २०१९ या कालावधीत लैंगिक छळाची ४५ प्रकरणे घडली. त्यापैकी प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांची चौकशी चार आठवड्यांच्या आत पूर्ण करावी, असे आदेश केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी दिले आहेत.रिजिजू यांनी सांगितले की, एसएआयच्या केंद्रांमध्ये लैंगिक छळाचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या प्रकरणांची शक्य तितक्या लवकर चौकशी व्हावी यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्यात येतील. ही माहिती एसएआयने एका निवेदनात दिली आहे.एसएआयच्या केंद्रांमध्ये घडलेल्या लैंगिक छळाच्या ४५ पैकी २९ घटनांत प्रशिक्षकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. जिमनॅस्टिक, अ‍ॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान या घटना घडल्या होत्या. हा तपशील माहिती कायद्यान्वये केलेल्या एका अर्जाला एसएआयने दिलेल्या उत्तरातून उघड झाला आहे. यासंदर्भात एसएआयच्या एका माजी संचालकाने सांगितले की, खेळाडूंच्या लैंगिक छळाच्या घटनांचा आकडा प्रत्यक्षात कितीतरी जास्त आहे.एसएआयने म्हटले आहे की, २०११ ते २०१९ या कालावधीत विविध क्रीडाप्रकारांतील खेळाडूंनी लैंगिक छळ झाल्याच्या ३५ तक्रारी केल्या. त्यातील २७ तक्रारी प्रशिक्षकांच्या विरोधात आहेत. या प्रकरणांच्या चौकशीत दोषी आढळलेल्या १४ जणांना दंड ठोठावण्यात आला तसेच १५ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. अन्य प्रकरणांमध्ये काही जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली किंवा तक्रार दाखल झालेल्यांविरोधात सबळ पुरावे मिळू शकले नव्हते.विनयभंगप्रकरणी चौकशीचे आदेशभारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) देशभरातील २४ केंद्रांमध्ये दहा वर्षांत विनयभंगाची ४५ प्रकरणे पुढे आल्याचे एका अहवालात सांगण्यात आले होते. यावर केंद्रीय क्रीडामंत्री रिजीजू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकार गंभीर असून याकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.दोषींना लहानसहान शिक्षाएसएआय केंद्रांमध्ये घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणांत पॉस्को कायदा तसेच कामकाजाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी केलेल्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे एसएआयने म्हटले आहे. मात्र, त्यातील बऱ्याच प्रकरणांत दोषींना लहानसहान शिक्षा देण्यात आल्या किंवा त्यांची बदली करण्यात आली असेही उजेडात आले होते. विविध क्रीडा प्रकारांची प्रशिक्षण शिबिरे एसएआय आयोजित करते. त्यात सहभागी होणाºया खेळाडूंना तक्रार नोंदविण्यासाठी एप्रिल २०१९पासून कॉल सेंटरही सुरू करण्यात आले.

टॅग्स :Indiaभारतsexual harassmentलैंगिक छळ