शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जम्मूसह पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा सुरू; खोऱ्याचा अपवाद; तूर्त सातच दिवसांसाठीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 06:58 IST

केंद्रीय मंत्र्यांची ही तुकडी तुलनेने कमी प्रकाश झोतातील; परंतु परिणामकारक असा शिक्षणात्मक कार्यक्रम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.

जम्मू : सर्वोच्च न्यायालयाने काश्मीर प्रशासनाची कानउघाडणी केल्यानंतर जम्मू-काश्मीरध्ये सुमारे साडेपाच महिन्यांनंतर बुधवारी मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. मात्र, ती केवळ जम्मू विभागांमधील पाच जिल्ह्यांसाठीच असून, काश्मीर खोºयातील एकाही जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा सुरू झालेली नाही.

आता केवळ सात दिवसांसाठीच पोस्टपेड मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली असून, नंतर आढावा घेऊ न ती कायम ठेवायची किंवा अन्य जिल्ह्यांमध्येही लागू करायची याबाबत निर्णय होणार आहे. जम्मू, रियासी, उधमपूर, सांबा, कठुआ या पाच जिल्ह्यांत पोस्टपेड मोबाईलवरच आज ही इंटरनेट सेवा सुरू झाली.

जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांतही ती सुरू झाली तरी दुपारपर्यंत इंटरनेट मिळतच नसल्याची तक्रार अनेक मोबाईलधारक करताना दिसत होते. तिथे टू-जी सेवाच असल्याने ती अतिशय संथ आहे आणि अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नाही, अशा तक्रारी काहींनी केल्या.गृह विभागाने इंटरनेट सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंगळवारी दिली. काश्मीर विभागामध्ये ४00 इंटरनेट किआॅस्क सुरू करण्यात येणार असल्याचेही गृह विभागाने म्हटले आहे. रुग्णालये, बँका, सरकारी कार्यालये येथे तसेच इंटरनेट सेवा देणाºया संस्थांना ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध होणार आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हॉटेल, यात्रा कंपन्या तसेच टूर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांनाही इंटरनेट उपलब्ध होणार आहे.जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा असलेला अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर सहा महिन्यांनी नरेंद्र मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये आक्रमक राजकीय जनसंपर्क साधण्याचा निर्णय घेतला आहे. या आक्रमक मोहिमेला अंतिम स्वरूप दिले जात असून, लोकांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची एक मोठी तुकडीच जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवास करील. लोकांशी संपर्क साधण्यासाठीच्या या फार मोठ्या मोहिमेत मोदी सरकारमधील दुसºया फळीतील मंत्री सहभागी असतील व ते केंद्र सरकार राबवत असलेली कल्याणकारी धोरणे व कार्यक्रमांचा प्रसार करतील. या मोहिमेचा हेतू हा लोकांंनी सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी व त्यांना त्यात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आहे.

केंद्रीय मंत्र्यांची ही तुकडी तुलनेने कमी प्रकाश झोतातील; परंतु परिणामकारक असा शिक्षणात्मक कार्यक्रम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. पंतप्रधानांनी अंतिम स्वरूप दिलेली हा महत्त्वाची जनसंपर्क मोहीम असल्याचे मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.आठवडाभर चालणाºया या संपर्क मोहिमेत गृहराज्यमंत्री जी. कृष्ण रेड्डी, स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, जितेंद्र सिंह आणि पीयूष गोयल व इतर सहभागी होतील.

 

टॅग्स :InternetइंटरनेटJammu Kashmirजम्मू-काश्मीर