शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Article 370: काश्मीर खरंच शांत? संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून वेगळेचं सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 3:49 PM

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर शांत असल्याचा सरकारचा दावा

नवी दिल्ली: कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा मोदी सरकारकडून करण्यात आला. अद्यापही सरकार आपल्या दाव्यावर ठाम आहे. मात्र संरक्षण दलांकडे असणाऱ्या कागदपत्रांमधून वेगळेची माहिती समोर आली आहे. कलम ३७० काढून टाकण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेकीच्या ३०६ घटना घडल्याची आकडेवारी संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. 'न्यूज१८'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये संसदेनं घेतला. या ऐतिहासिक निर्णयाला दोन महिने झाले आहेत. या कालावधीत काश्मीरमध्ये दगडफेकीच्या ३०६ घटना घडल्या आहेत. म्हणजेच काश्मीरात प्रत्येक दिवशी सरासरी पाच दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये सुरक्षा दलांचे जवळपास १०० जवान जखमी झाले. यापैकी ८९ जवान निमलष्करी दलाचे आहेत. काश्मीरमधील बहुतांश भागात शांतता असल्याचा दावा जम्मू काश्मीर प्रशासनानं केला. २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणीचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. त्यानंतर काश्मीर पेटलं होतं. त्या तुलनेत सध्याची काश्मीरमधील स्थिती अतिशय चांगली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यात दगडफेकीच्या केवळ ४० घटना घडल्या होत्या, असंदेखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ६ ऑगस्टला संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी काश्मीरमधील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती. कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय होताच काश्मीरमधील अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काश्मीरमधील फोन आणि इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली. याशिवाय जवळपास ४ हजार लोकांना ताब्यात घेण्यात आलं. काश्मीरमधील अनेक प्रमुख नेत्यांना या काळात नजरकैदेत ठेवण्यात आलं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370