शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाह अवैध, हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नासाठी हिंदू असणे आवश्यक - सुप्रीम कोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:50 IST

धर्मांतर न करता हिंदू रीतिरिवाजांनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींमधील विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध आहे का?

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : आंतरधर्मीय जोडप्यांमधील विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार रद्दबातल ठरतो. या कायद्यानुसार केवळ हिंदूच लग्न करू शकतात, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. २०१७ मध्ये तेलंगणातील एका हिंदू महिलेने तिच्या पतीविरुद्ध ४९४ आयपीसी प्रमाणे गुन्हा नोंदवला. ४९४ मध्ये पहिला जोडीदार असताना दुसरे लग्न केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या प्रकरणात महिला हिंदू असून, आरोपी पती भारतीय-अमेरिकन ख्रिश्चन आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीने खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र ती फेटाळण्यात आली. 

पुरुषाने दावा केला की, त्याने कधीही हिंदू धर्म स्वीकारला नाही. तक्रारदारासोबतचा कथित विवाह, समारंभाच्या आधी कधीही नोंदवला गेला नाही. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जोसेफ यांनी ‘लग्न अग्राह्य आहे’ अशी टिप्पणी केली. “हिंदू कायद्यांतर्गत फक्त हिंदूच विवाह करू शकतात,” असे म्हणत न्यायमूर्ती नागरथना यांनीही न्या. जोसेफ यांचे समर्थन केले. आता कोर्टाने हे प्रकरण फेब्रुवारीमध्ये अंतिम सुनावणीसाठी ठेवले आहे.

कायद्याचे प्रश्नधर्मांतर न करता हिंदू रीतिरिवाजांनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींमधील विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध आहे का?विवाह अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह केला जाऊ शकतो का?

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयmarriageलग्न