शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

आंतरधर्मीय विवाह अवैध, हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नासाठी हिंदू असणे आवश्यक - सुप्रीम कोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:50 IST

धर्मांतर न करता हिंदू रीतिरिवाजांनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींमधील विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध आहे का?

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : आंतरधर्मीय जोडप्यांमधील विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार रद्दबातल ठरतो. या कायद्यानुसार केवळ हिंदूच लग्न करू शकतात, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. २०१७ मध्ये तेलंगणातील एका हिंदू महिलेने तिच्या पतीविरुद्ध ४९४ आयपीसी प्रमाणे गुन्हा नोंदवला. ४९४ मध्ये पहिला जोडीदार असताना दुसरे लग्न केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या प्रकरणात महिला हिंदू असून, आरोपी पती भारतीय-अमेरिकन ख्रिश्चन आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीने खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र ती फेटाळण्यात आली. 

पुरुषाने दावा केला की, त्याने कधीही हिंदू धर्म स्वीकारला नाही. तक्रारदारासोबतचा कथित विवाह, समारंभाच्या आधी कधीही नोंदवला गेला नाही. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जोसेफ यांनी ‘लग्न अग्राह्य आहे’ अशी टिप्पणी केली. “हिंदू कायद्यांतर्गत फक्त हिंदूच विवाह करू शकतात,” असे म्हणत न्यायमूर्ती नागरथना यांनीही न्या. जोसेफ यांचे समर्थन केले. आता कोर्टाने हे प्रकरण फेब्रुवारीमध्ये अंतिम सुनावणीसाठी ठेवले आहे.

कायद्याचे प्रश्नधर्मांतर न करता हिंदू रीतिरिवाजांनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींमधील विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध आहे का?विवाह अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह केला जाऊ शकतो का?

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयmarriageलग्न