शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले भाजपाचे मंत्री अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 12:35 IST

Union Minister A Narayanaswamy : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले.

नवी दिल्ली - श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी कर्तव्यावर असलेल्या सैनिकाच्या घरी केंद्रीय मंत्री पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री ए नारायणस्वामी (Union Minister A Narayanaswamy) गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले. तसेच जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. स्थानिक नेत्यांनी चुकीची माहिती दिल्याने हे घडले असल्याचं सांगितलं जात आहे. नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात नुकतेच मंत्री झालेले नारायणस्वामी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा भाग म्हणून गाडग जिल्ह्यात होते. त्यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाच्या घरी गेले. 

भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र्यांना वर्षभरापूर्वी पुण्यात आपला जीव गमावलेल्या बसवराज हिरेमठ यांच्या ऐवजी जवान रविकुमार कट्टीमनी यांच्या घरी नेण्यात आले, जे सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात आहेत. ए नारायणस्वामींच्या यात्रेनुसार ते शहीद जवानाच्या कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन करणार होते. नारायणस्वामी खासदार शिवकुमार उदासीसह मुलगुंड भागात पोहोचले, जिथे त्यांना कट्टीमनी यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. यामुळे जवानाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

जवानाच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि जमीन देण्याची घोषणा मंत्र्यांनी केली तेव्हा कुटुंबीयांना धक्का बसला आणि सारेच जण हैराण झाले. नंतर भाजपाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने रविकुमार कट्टीमनी यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्याने ए नारायणस्वामींसोबत संवाद साधला. जेव्हा नारायणस्वामींना त्यांच्या चुकीबद्दल कळले तेव्हा त्यांनी परिस्थिती हाताळल्याबद्दल जवानाचे कौतुक केले आणि त्याच्या कुटुंबाचा देखील सन्मान केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी नंतर या चूकीसाठी स्थानिक भाजपा नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, नंतर मंत्री शहीद जवान हिरेमठ यांच्या घरी गेले नाहीत. "आमच्या घरी कोणी आले नाही. मंत्री जिवंत असलेल्या एका जवानाच्या घरी गेले. मला माझा मुलगा परत हवा आहे" असे शहीद जवानाच्या आईने म्हटलं आहे. या घटनेनंतर काही नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपाIndian Armyभारतीय जवान