शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले भाजपाचे मंत्री अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 12:35 IST

Union Minister A Narayanaswamy : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले.

नवी दिल्ली - श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी कर्तव्यावर असलेल्या सैनिकाच्या घरी केंद्रीय मंत्री पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री ए नारायणस्वामी (Union Minister A Narayanaswamy) गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले. तसेच जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. स्थानिक नेत्यांनी चुकीची माहिती दिल्याने हे घडले असल्याचं सांगितलं जात आहे. नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात नुकतेच मंत्री झालेले नारायणस्वामी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा भाग म्हणून गाडग जिल्ह्यात होते. त्यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाच्या घरी गेले. 

भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र्यांना वर्षभरापूर्वी पुण्यात आपला जीव गमावलेल्या बसवराज हिरेमठ यांच्या ऐवजी जवान रविकुमार कट्टीमनी यांच्या घरी नेण्यात आले, जे सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात आहेत. ए नारायणस्वामींच्या यात्रेनुसार ते शहीद जवानाच्या कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन करणार होते. नारायणस्वामी खासदार शिवकुमार उदासीसह मुलगुंड भागात पोहोचले, जिथे त्यांना कट्टीमनी यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. यामुळे जवानाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

जवानाच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि जमीन देण्याची घोषणा मंत्र्यांनी केली तेव्हा कुटुंबीयांना धक्का बसला आणि सारेच जण हैराण झाले. नंतर भाजपाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने रविकुमार कट्टीमनी यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्याने ए नारायणस्वामींसोबत संवाद साधला. जेव्हा नारायणस्वामींना त्यांच्या चुकीबद्दल कळले तेव्हा त्यांनी परिस्थिती हाताळल्याबद्दल जवानाचे कौतुक केले आणि त्याच्या कुटुंबाचा देखील सन्मान केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी नंतर या चूकीसाठी स्थानिक भाजपा नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, नंतर मंत्री शहीद जवान हिरेमठ यांच्या घरी गेले नाहीत. "आमच्या घरी कोणी आले नाही. मंत्री जिवंत असलेल्या एका जवानाच्या घरी गेले. मला माझा मुलगा परत हवा आहे" असे शहीद जवानाच्या आईने म्हटलं आहे. या घटनेनंतर काही नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपाIndian Armyभारतीय जवान