शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

"पहिल्या पगारातून वडिलांचं कर्ज फेडणार’’, लाखोंचं पॅकेज मिळाल्यानंतर लेकीचं भावूक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:39 IST

Inspirational Stories: जमाना बदलला असला तरी आपला संघर्षाचा काळ आठवणीत ठेवणाऱ्या त्या काळात आई-वडिलांनी आपल्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टांची जाणीव ठेवणाऱ्या मुलांची काही उदाहरणं आपल्यासमोर अधूनमधून येत असतात. आज लाखोंच्या पॅकेजचं ऑफर लेटर मिळवणाऱ्या रोहिणी नावाच्या तरुणीची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे.

जमाना बदलला असला तरी आपला संघर्षाचा काळ आठवणीत ठेवणाऱ्या त्या काळात आई-वडिलांनी आपल्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टांची जाणीव ठेवणाऱ्या मुलांची काही उदाहरणं आपल्यासमोर अधूनमधून येत असतात. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील खोडा येथे राहून शिक्षण घेत यश मिळवून आज लाखोंच्या पॅकेजचं ऑफर लेटर मिळवणाऱ्या रोहिणी नावाच्या तरुणीची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे. खूप मेहनतीनंतर यशस्वी झालेल्या रोहिली मिश्रा हिला तिच्या बालपणीचे दिवस अजूनही आठवतात. जेव्हा तिने खूप शिकून घरची परिस्थिती बदलण्याचा स्वत:शीच निश्चय केला होता. आज तिने हा निश्चय खरा करून दाखवला.

रोहिणी मिश्रा या तरुणीची कहाणी खूप संघर्षाने भरलेली पण प्रेरणादायी अशीच आहे. गाझियाबादमधील खोडा परिसरात राहणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी कुटुंबांमध्ये इंद्रमोहन मिश्रा यांच्याही कुटुंबाचा समावेश होता. छोट्याशा भाड्याच्या खोलीत इंद्रमोहन मिश्रा त्यांची पत्नी सुषमा मिश्रा, मुलगी रोहिणी मिश्रा आणि मुलगा रोहित हे राहत होते. रोहिणी सांगते की, आमचं कुटुंब एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब होतं. पाचवीनंतर शिक्षण महाग झाल्याने मला आणि माझ्या भावाला वडिलांनी सरकारी शाळेत टाकले. तिथे शिक्षण सुरू असताना क्लासचा खूप लोड येत असे. पुढे नववीपर्यंत मी घरामध्ये खूप अभ्यास करून चांगले गुण मिळवले.

रोहिणी मिश्राने पुढे सांगितले की, सेक्टर ६२ मध्ये योगदा सत्संग सोसायटीशी संबंधित काही लोक मुलांना शिकवतात, असं मला समजलं. जेव्हा मी या आश्रमातील काही लोकांना भेटले तेव्हा आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन इंजिनियर बनता येतं, असं मला समजलं. तेव्हा मी जेईई आणि नंतर अॅडव्हान परीक्षा उत्तीर्ण करायची असा निश्चय मनाशी केला. इथून माझ्या अभ्यासात प्रगती सुरू झाली. दहावीत मी गौतमबुद्धनगरमधील सरकारी शाळांमधून पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. तेव्हा मला ८९ टक्के गुण मिळाले.

बारावीसोबत जेईईची तयारीही मी करत होते. त्यावेळी मी बारावीत ८४ टक्के गुण मिळवत जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तेव्हा मी पहिल्या प्रयत्नात जेईई क्लिअर करू शकले नाही. त्यामुळे मी बारावीनंतर एक वर्ष ड्रॉप घेतला. तेव्हा एका नव्यानेच सुरू झालेल्या कोचिंग क्लासमध्ये सवलत मिळत होती. मी तिथूनच अभ्यास केला. माझ्या वडिलांनी लोकांकडून कर्ज घेऊन माझ्या कोचिंगचा खर्च भागवला. त्यानंतर मी ७४८३ रँकसह उत्तीर्ण झाले. त्यामुळे माझी आयआयटी खडकपूर येथे निवड झाली. आता माझ्या शिक्षणाची चार वर्षे संपत आहेत.  येथूनच मला नोकरी मिळाली आहे. मला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधून २१ लाख रुपयांची सीटीसी ऑफर झाली आहे, अशी माहिती रोहिणी हिने दिली.

आता अजून तीन ते चार महिन्यांचं शिक्षण बाकी आहे. त्यानंतर नोकरीला सुरुवात झाल्यावर मी सर्वप्रथम वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करेन. माझ्यासारखी अनेक मुलं विचार करतात की आयआयटीसाखं महागडं शिक्षण कसं घ्यायचं. माझ्या कुटुंबालासुद्धा १०-१२ लाख रुपयांचा खर्च झेपला नसला. त्यामुळे मी बँकेमधून कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केलं. मात्र मला शिष्यवृत्ती आणि मिळालेली असल्याने मला १२ लाख नाही तर सहा लाख रुपयेच द्यावे लागले आहेत. तर आता माझ्या भावाचीही हवाई दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे माझे आई वडील आनंदीत आहे. त्यांचा आनंद पाहून मीही समाधानी आहे, असेही रोहिणी मिश्रा हिने सांगितले.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षणFamilyपरिवारUttar Pradeshउत्तर प्रदेश