शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"पहिल्या पगारातून वडिलांचं कर्ज फेडणार’’, लाखोंचं पॅकेज मिळाल्यानंतर लेकीचं भावूक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:39 IST

Inspirational Stories: जमाना बदलला असला तरी आपला संघर्षाचा काळ आठवणीत ठेवणाऱ्या त्या काळात आई-वडिलांनी आपल्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टांची जाणीव ठेवणाऱ्या मुलांची काही उदाहरणं आपल्यासमोर अधूनमधून येत असतात. आज लाखोंच्या पॅकेजचं ऑफर लेटर मिळवणाऱ्या रोहिणी नावाच्या तरुणीची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे.

जमाना बदलला असला तरी आपला संघर्षाचा काळ आठवणीत ठेवणाऱ्या त्या काळात आई-वडिलांनी आपल्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टांची जाणीव ठेवणाऱ्या मुलांची काही उदाहरणं आपल्यासमोर अधूनमधून येत असतात. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील खोडा येथे राहून शिक्षण घेत यश मिळवून आज लाखोंच्या पॅकेजचं ऑफर लेटर मिळवणाऱ्या रोहिणी नावाच्या तरुणीची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे. खूप मेहनतीनंतर यशस्वी झालेल्या रोहिली मिश्रा हिला तिच्या बालपणीचे दिवस अजूनही आठवतात. जेव्हा तिने खूप शिकून घरची परिस्थिती बदलण्याचा स्वत:शीच निश्चय केला होता. आज तिने हा निश्चय खरा करून दाखवला.

रोहिणी मिश्रा या तरुणीची कहाणी खूप संघर्षाने भरलेली पण प्रेरणादायी अशीच आहे. गाझियाबादमधील खोडा परिसरात राहणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी कुटुंबांमध्ये इंद्रमोहन मिश्रा यांच्याही कुटुंबाचा समावेश होता. छोट्याशा भाड्याच्या खोलीत इंद्रमोहन मिश्रा त्यांची पत्नी सुषमा मिश्रा, मुलगी रोहिणी मिश्रा आणि मुलगा रोहित हे राहत होते. रोहिणी सांगते की, आमचं कुटुंब एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब होतं. पाचवीनंतर शिक्षण महाग झाल्याने मला आणि माझ्या भावाला वडिलांनी सरकारी शाळेत टाकले. तिथे शिक्षण सुरू असताना क्लासचा खूप लोड येत असे. पुढे नववीपर्यंत मी घरामध्ये खूप अभ्यास करून चांगले गुण मिळवले.

रोहिणी मिश्राने पुढे सांगितले की, सेक्टर ६२ मध्ये योगदा सत्संग सोसायटीशी संबंधित काही लोक मुलांना शिकवतात, असं मला समजलं. जेव्हा मी या आश्रमातील काही लोकांना भेटले तेव्हा आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन इंजिनियर बनता येतं, असं मला समजलं. तेव्हा मी जेईई आणि नंतर अॅडव्हान परीक्षा उत्तीर्ण करायची असा निश्चय मनाशी केला. इथून माझ्या अभ्यासात प्रगती सुरू झाली. दहावीत मी गौतमबुद्धनगरमधील सरकारी शाळांमधून पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. तेव्हा मला ८९ टक्के गुण मिळाले.

बारावीसोबत जेईईची तयारीही मी करत होते. त्यावेळी मी बारावीत ८४ टक्के गुण मिळवत जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तेव्हा मी पहिल्या प्रयत्नात जेईई क्लिअर करू शकले नाही. त्यामुळे मी बारावीनंतर एक वर्ष ड्रॉप घेतला. तेव्हा एका नव्यानेच सुरू झालेल्या कोचिंग क्लासमध्ये सवलत मिळत होती. मी तिथूनच अभ्यास केला. माझ्या वडिलांनी लोकांकडून कर्ज घेऊन माझ्या कोचिंगचा खर्च भागवला. त्यानंतर मी ७४८३ रँकसह उत्तीर्ण झाले. त्यामुळे माझी आयआयटी खडकपूर येथे निवड झाली. आता माझ्या शिक्षणाची चार वर्षे संपत आहेत.  येथूनच मला नोकरी मिळाली आहे. मला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधून २१ लाख रुपयांची सीटीसी ऑफर झाली आहे, अशी माहिती रोहिणी हिने दिली.

आता अजून तीन ते चार महिन्यांचं शिक्षण बाकी आहे. त्यानंतर नोकरीला सुरुवात झाल्यावर मी सर्वप्रथम वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करेन. माझ्यासारखी अनेक मुलं विचार करतात की आयआयटीसाखं महागडं शिक्षण कसं घ्यायचं. माझ्या कुटुंबालासुद्धा १०-१२ लाख रुपयांचा खर्च झेपला नसला. त्यामुळे मी बँकेमधून कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केलं. मात्र मला शिष्यवृत्ती आणि मिळालेली असल्याने मला १२ लाख नाही तर सहा लाख रुपयेच द्यावे लागले आहेत. तर आता माझ्या भावाचीही हवाई दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे माझे आई वडील आनंदीत आहे. त्यांचा आनंद पाहून मीही समाधानी आहे, असेही रोहिणी मिश्रा हिने सांगितले.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षणFamilyपरिवारUttar Pradeshउत्तर प्रदेश