शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करा; सुप्रीम कोर्टात याचिका, कडक कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 07:18 IST

Farmers Protest: प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेला हिंसाचार, ज्यांनी दिल्लीत हिंसाचार केला त्यांच्यावर तसेच या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या संघटनांविरोधात गुन्हे नोंदविण्यात यावेत व कडक कारवाई करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा.

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताकदिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल करण्यात आली आहे.

ज्यांनी दिल्लीत हिंसाचार केला त्यांच्यावर तसेच या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या संघटनांविरोधात गुन्हे नोंदविण्यात यावेत व कडक कारवाई करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा. हिंसाचार करणाऱ्यांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचाही अपमान केला आहे, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. ही याचिका अ‍ॅड. विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांची समिती नेमून दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यात यावी. ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागून अनेक जण जखमी झाले व सार्वजनिक, खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे.साऱ्या जगाचे वेधले लक्ष सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झालेल्या याचिकेत म्हटले आहे की, दिल्लीतील हिंसाचाराचे हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 

या हिंसाचारामागे कारस्थानही  असू शकते. त्यामुळे या सर्वच गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये आयोजित शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला मंगळवारी लागलेल्या हिंसक वळणामध्ये तीनशेहून अधिक पोलीस जखमी झाले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २२ गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत धडक मारून तिथे तिरंगा उतरवून खलिस्तानचा ध्वज फडकावल्याचा आरोप समाजमाध्यमांतून झाला होता. पण तो खरा नसल्याचे एका व्हिडीओतून स्पष्ट झाले आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन चिघळले आहे. नवीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत व केंद्र सरकारला ते मान्य नाही. दिल्लीच्या ज्या भागात ट्रॅक्टर मोर्चेकऱ्यांना येण्यास बंदी केली होती, तिथे ते आल्याने पोलिसांनी त्यांना अडविले. शेतकरी व पोलिसांमध्ये मोठी चकमकही झाली. आंदोलकांनी अनेक वाहने उलटवून दिली.

‘तो’ ध्वज खलिस्तानचा नव्हे, तर, शीख धर्माचा

लाल किल्ल्यामध्ये घुसून आंदोलकांनी तिथला तिरंगा ध्वज उतरविला व त्याऐवजी खलिस्तानचा ध्वज फडकाविला, असा आरोप मंगळवारी झाला होता. मात्र त्यासंदर्भात समाजमाध्यमावर झळकलेल्या एका व्हिडीओत असे स्पष्ट दिसते आहे की, लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वज डौलाने फडकत असून त्याच्या शेजारी एक काठी रिकामी होती, त्यावर आंदोलकांपैकी एकाने भगव्या, पिवळ्या रंगाचे फडकविलेले ध्वज हे खलिस्तानचे नाहीत. त्यातील भगवा ध्वज शिखांचा धार्मिक ध्वज आहे. त्याला ‘निशाण साहिब’ म्हणतात.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपSupreme Courtसर्वोच्च न्यायालय