शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:11 IST

चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग राजस्थानातील अलवर येथे राहतात. सुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला.

ठळक मुद्देसुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला.जवानाच्या पत्नीने सांगितला, पतीचा पराक्रम.सुरेंद्र यांच्या डोक्याला 10-12 टाके पडले आहेत आणि हाता-पायालाही इजा झाली आहे.'

नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यातील चीनीसैनिकांच्या धोक्याची कहाणी हळू-हळू समोर येऊ लागली आहे. सोमवारी रात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या एका जवानाने, आपल्या वडिलांना त्या रात्रीची थरारक कहाणी सांगितली. या चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले, तर चीनचे 35 सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे.

भारताचे 300 जवान vs चीनचे 2500 जवान -चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग राजस्थानातील अलवर येथे राहतात. सुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला. एका खासगी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जवान सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग यांनी सांगितले, की 'त्या दिवशी मला 11-12 वाजता फोन आला. मी विचारले, कोठे आहे, तर त्याने सांगितले, रुग्णालयात आहे. लेहमधील रुग्णालयात, मी व्यवस्थित आहे.' जवान सुरेंद्र सिंग फोनवर म्हणाले, 'आम्ही 300-400च जवान होतो. चीनी सैनिक अचानक आले. ते 2,000-2,500 होते. त्यांच्याकडे रॉड आणि दंड होते. त्यांनी अचाकच दगड फेक करायला सुरुवात केली. आमच्याकडे शस्त्र नव्हते. माझ्या डोक्याला 10-12 टाके पडले आहेत आणि हाता-पायालाही इजा झाली आहे.'

India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले

जवानाच्या पत्नीने सांगितला, पतीचा पराक्रम -जखमी जवान सुरेंद्र यांची पत्नी गुरप्रीत कौर यांनी आपल्या पतीचा पराक्रम सांगितला. त्या म्हणाल्या, सुरेंद्र यांनी शत्रूच्या दोन-तीन सैनिकांना मारले. यावेळी जवानांकडे शस्त्र नव्हते. चर्चेचे वातवरण होते. चर्चेतून समस्या सोडविण्यावर बोलणे सुरू होते. असे असतानाच चिनी सैनिक शस्त्रांसह आले.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

तणाव कायम -गेल्या 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. गेल्या महिनाभरापासून लडाखच्या अनेक भागांत चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर आहे. चर्चेनंतरही चीन दिलेला शब्द पाळायला तयार नाही. त्यांनी भारतीय सैनिकांनाही धोका दिला आहे. चर्चा सुरू असतानाही चीन सीमेवर सैनिक आणि शस्त्रांचा साठा वाढवतच होता. 

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

टॅग्स :border disputeसीमा वादSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानIndiaभारतladakhलडाखchinaचीन