शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

साथीदारांनीच जेव्हा गोळी मारली; तेव्हा दहशतवाद्याला समजले खरा शत्रू कोण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 4:13 PM

जिहादच्या काही दिवसांच्या प्रवासातच आरिफला खऱ्याने डोळ्यावरील झापडा उघडल्या.

श्रीनगर : काही वाईट शक्तींनी धर्माच्या नावाखाली माथी भडकविल्याने काश्मीरचा एक तरुम जिहादी बनण्यासाठी घर सोडून निघाला होता. यावेळी त्याच्या मनात एकच गोष्ट भिनभिनत होती की, काश्मिरींचे आणि इस्लामचे दुश्मन केवळ भारतीय फौजच आहे. अशातच जेव्हा त्याच्या हातात असॉल्ट रायफल मिळाली तेव्हा त्याने व्हिडिओ बनवत भारतीय सैन्याला हरविणार, कारण ते काश्मीरचे दुश्मन आहेत, असे सांगितले होते.  

मात्र, जिहादच्या काही दिवसांच्या प्रवासातच आरिफला खऱ्याने डोळ्यावरील झापडा उघडल्या. आता एका हॉस्पिटलच्या खाटेवर झोपलेला आरिफ भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना सांगतोय की त्याच्याकडून चूक झाली. मला तुमच्यासारखी वर्दी घालायला हवी होती आणि देशाच्या संरक्षणासाठी बंदूक हातात धरायला हवी होती. 

 

दक्षिण काश्मीरच्या बिजबाहाडाच्या फतेहपोरामध्ये आरिफ हुसैन बट राहत होता. त्याला आणि त्याच्या अन्य एक साथीदार आदील अहमद यांना गेल्या रात्री हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी एका बैठकीसाठी बोलावले होते. अंधारातच हे दोघे दहशतवाद्यांना भेटायला पोहोचले होते. आरिफला असे वाटले होते की, हिज्बुल आणि लष्कराचे दहशतवादी आमच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आले असतील. ते आमच्यासोबत मिळून भारतीय सैन्यावर हल्ला करणार असतील. मात्र मी चुकीचा होतो. 

आरिफच्या म्हणण्यानुसार, आम्ही जेव्हा बागेत पोहोचलो तेव्हा आम्हाला घेरण्यात आले. आमच्यावर जिहादचे दुश्मन आणि पाकिस्तानच्या विरोधात गेल्याचा आरोप करण्यात आला. मारहाण करत आमच्याकडील शस्त्रे काढून घेतली. आदिलला माझ्यासमोरच गोळ्यांनी ठार करण्यात आले. पण त्यांनी मला मारले नाही. त्यांनी हिज्बुल किंवा लश्करमध्ये सहभागी होण्यास सांगितले. जेव्हा मी पळायला लागलो तेव्हा त्यांनी माझ्या पायावर गोळी मारली आणि सांगितले की तू नवीन आहेस म्हमून तुला सोडतोय.

आरिफला वाटले की आता आपल्याला भारतीय जवान सोडणार नाहीत. पोलिस येऊन मला गोळ्या घालतील. गोळी लागल्याने वेदना होत होत्या. जेव्हा जवान आणि काही नागरिक तेथे आले तेव्हा मला कोणी मारले नाही. जवानांनी फक्त एवढेच सांगितले की हत्यारे असतील तर खाली ठेव. तेव्हा त्याने जवानांना सांगितले की, मला गोळी लागलीय. त्यावर जवानाचे उत्तर ऐकून आरिफला रडू कोसळले. भारतीय जवानाने त्याला सांगितले होते, थोडक्यात वाचलायस, आम्ही तुला मरण्यासाठी असेच सोडून जाऊ शकत नाही. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तुझे कुटुंबीयही तुला पाहण्यासाठी आतुरलेले असतील. माफी मागायचीच असेल तर त्यांची माग. 

आरिफला शिक्षा होईल की नाही हे माहिती नाही. पण त्याने सांगितले की, त्याला आता पुरते माहिती झाले आहे की त्यांच्या शत्रू कोण आहे. मी जेव्हा घरी जाईन तेव्हा मशीदीत जाऊन माझ्यासारख्या तरुणांना फितवणाऱ्या शत्रूंविरोधात जिहाद पुकारणार असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान