शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

देशातील लोकशाहीवर सध्या हुकूमशाहीचा प्रभाव वाढतोय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 04:47 IST

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.

नवी दिल्ली : काही देशद्रोही आणि गरीबविरोधी शक्ती सध्या देशात वैमनस्य व हिंसाचाराचे विष पसरवीत आहेत व देशाच्या लोकशाहीवर हुकूमशाहीचा प्रभाव वाढत चालला आहे, असा आरोप करीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर आडून टीका केली.सोनिया गांधी असेही म्हणाल्या की, देशात सध्या कुटिल विचारांचा बोलबाला आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे व लोकशाही संस्था नष्ट केल्या जात आहेत. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.छत्तीसगढच्या ‘नया रायपूर’ या नव्याने उभारण्यात येत असलेल्या राजधानीत विधानसभा संकुलाच्या पायाभरणी समारंभानिमित्त आधी ध्वनिमुद्रित करून पाठविलेल्या हिंदी संदेशात सोनियाजी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेला काही काळ देशाचा गाडा रुळावरून घसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. त्याने देशापुढे नवी आव्हाने उभी राहिली आहेत.

आज देश एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. गरीबविरोधी, देशद्रोही शक्ती, तसेच सत्तेत असलेले वैमनस्य आणि हिंसाचाराचे विष कालवून लोकांमध्ये आपसात भांडणे लावत आहेत.प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, विधानसभा अध्यक्ष चरन दास महंत व राज्याचे मंत्री उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल हजेरी लावली.लोकांचा आवाज दडपू पाहत आहेतकोणाचेही थेट नाव न घेता काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या की, ते देशातील लोकांचा आवाज दडपू पाहत आहेत. तरुण पिढी, आदिवासी, महिला, शेतकरी, छोटे दुकानदार व जवान अशा सर्वांची तोंडे ते बंद करू पाहत आहेत. केवळ विधानसभेची भव्य वास्तू बांधून लोकशाहीचे रक्षण होणार नाही. त्यासाठी आपणा सर्वांना लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊन अविरतपणे झटावे लागेल, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसdemocracyलोकशाही