शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

देशातील लोकशाहीवर सध्या हुकूमशाहीचा प्रभाव वाढतोय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 04:47 IST

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.

नवी दिल्ली : काही देशद्रोही आणि गरीबविरोधी शक्ती सध्या देशात वैमनस्य व हिंसाचाराचे विष पसरवीत आहेत व देशाच्या लोकशाहीवर हुकूमशाहीचा प्रभाव वाढत चालला आहे, असा आरोप करीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर आडून टीका केली.सोनिया गांधी असेही म्हणाल्या की, देशात सध्या कुटिल विचारांचा बोलबाला आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे व लोकशाही संस्था नष्ट केल्या जात आहेत. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.छत्तीसगढच्या ‘नया रायपूर’ या नव्याने उभारण्यात येत असलेल्या राजधानीत विधानसभा संकुलाच्या पायाभरणी समारंभानिमित्त आधी ध्वनिमुद्रित करून पाठविलेल्या हिंदी संदेशात सोनियाजी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेला काही काळ देशाचा गाडा रुळावरून घसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. त्याने देशापुढे नवी आव्हाने उभी राहिली आहेत.

आज देश एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. गरीबविरोधी, देशद्रोही शक्ती, तसेच सत्तेत असलेले वैमनस्य आणि हिंसाचाराचे विष कालवून लोकांमध्ये आपसात भांडणे लावत आहेत.प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, विधानसभा अध्यक्ष चरन दास महंत व राज्याचे मंत्री उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल हजेरी लावली.लोकांचा आवाज दडपू पाहत आहेतकोणाचेही थेट नाव न घेता काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या की, ते देशातील लोकांचा आवाज दडपू पाहत आहेत. तरुण पिढी, आदिवासी, महिला, शेतकरी, छोटे दुकानदार व जवान अशा सर्वांची तोंडे ते बंद करू पाहत आहेत. केवळ विधानसभेची भव्य वास्तू बांधून लोकशाहीचे रक्षण होणार नाही. त्यासाठी आपणा सर्वांना लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊन अविरतपणे झटावे लागेल, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसdemocracyलोकशाही