शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:09 IST

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरीवरून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद निर्माण झाला आहे. 

बोकारो - हिंदू असो, मुस्लीम असो किंवा घुसखोर असो आम्ही काहीही न बघता सर्वांना ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देऊ असं विधान झारखंडमधीलकाँग्रेस प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी केले आहे. घुसखोरांनाही सुविधा देण्याच्या काँग्रेस नेत्याच्या या विधानामुळे ऐन निवडणुकीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवार कुमार जयमंगल यांच्या सभेत लोकांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर यांनी हे वक्तव्य केले आहे.

चंद्रपुरा येथील जाहीर सभेत गुलाम अहमद मीर म्हणाले की, आम्ही हे वचन दिलंय, जर आमचे सरकार बनलं तर १ डिसेंबरपासून ४५० रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध केले जातील. हे सर्वसामान्य लोकांना असेल. मग तो हिंदू असो, मुसलमान असो अथवा घुसखोर असो, झारखंडमधील सर्व लोकांना आम्ही गॅस सिलेंडर देऊ, कुणासोबतही अन्यायकारक विचार आम्ही करणार नाही असं त्यांनी म्हटलं. परंतु या विधानामुळे भाजपा नेते संतप्त झाले आहेत. व्होट बँकेचे राजकारण करत असल्याने राज्यात घुसखोरांना प्रोत्साहन देण्याचं काम काँग्रेस करत आहे असा आरोप करण्यात येत आहे. 

गुलाम अहमद मीर यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी घुमजाव केले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस लोकांमध्ये भेदभाव न करता मदत करते. भाजपा मागील १० वर्षापासून सत्तेत आहे मात्र घुसखोर कोण हे त्यांना ओळखता आले नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही भेदभाव करणार नाही असं गुलाम अहमद मीर यांनी सांगितले. झारखंड विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी घुसखोर हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. नक्षलवाद आणि घुसखोरी यावर भाजपा नेते आक्रमकपणे बोलत आहेत. त्यात काँगेस नेत्याच्या विधानामुळे भाजपाला आयती संधी मिळाली आहे. 

दरम्यान, स्वस्त गॅस सिलेंडर हिंदू, मुस्लीम आणि जे घुसखोर आहेत त्यांनाही देऊ असं काँग्रेस नेता झारखंडमध्ये बोलतोय. जे घुसखोरांना सांभाळतायेत त्यांना देशात कुठे संधी मिळावी का? उघडपणे काँग्रेस नेता ही घोषणा करतो. रोहिंगे, बांगलादेशी यांना स्वस्तात गॅस सिलेंडर देणार. व्होट बँकेसाठी देशातील पुढच्या पिढीच्या भविष्याची खेळ करतायेत याचे हे उदाहरण आहे. काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करण्यात पुढे आहे परंतु देशातील गरिबांची शत्रू आहे. काँग्रेसला रोखण्याचं काम आपल्याला केले पाहिजे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पनवेल येथील सभेत केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसJharkhandझारखंडBJPभाजपा