शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:09 IST

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरीवरून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद निर्माण झाला आहे. 

बोकारो - हिंदू असो, मुस्लीम असो किंवा घुसखोर असो आम्ही काहीही न बघता सर्वांना ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देऊ असं विधान झारखंडमधीलकाँग्रेस प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी केले आहे. घुसखोरांनाही सुविधा देण्याच्या काँग्रेस नेत्याच्या या विधानामुळे ऐन निवडणुकीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवार कुमार जयमंगल यांच्या सभेत लोकांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर यांनी हे वक्तव्य केले आहे.

चंद्रपुरा येथील जाहीर सभेत गुलाम अहमद मीर म्हणाले की, आम्ही हे वचन दिलंय, जर आमचे सरकार बनलं तर १ डिसेंबरपासून ४५० रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध केले जातील. हे सर्वसामान्य लोकांना असेल. मग तो हिंदू असो, मुसलमान असो अथवा घुसखोर असो, झारखंडमधील सर्व लोकांना आम्ही गॅस सिलेंडर देऊ, कुणासोबतही अन्यायकारक विचार आम्ही करणार नाही असं त्यांनी म्हटलं. परंतु या विधानामुळे भाजपा नेते संतप्त झाले आहेत. व्होट बँकेचे राजकारण करत असल्याने राज्यात घुसखोरांना प्रोत्साहन देण्याचं काम काँग्रेस करत आहे असा आरोप करण्यात येत आहे. 

गुलाम अहमद मीर यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी घुमजाव केले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस लोकांमध्ये भेदभाव न करता मदत करते. भाजपा मागील १० वर्षापासून सत्तेत आहे मात्र घुसखोर कोण हे त्यांना ओळखता आले नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही भेदभाव करणार नाही असं गुलाम अहमद मीर यांनी सांगितले. झारखंड विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी घुसखोर हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. नक्षलवाद आणि घुसखोरी यावर भाजपा नेते आक्रमकपणे बोलत आहेत. त्यात काँगेस नेत्याच्या विधानामुळे भाजपाला आयती संधी मिळाली आहे. 

दरम्यान, स्वस्त गॅस सिलेंडर हिंदू, मुस्लीम आणि जे घुसखोर आहेत त्यांनाही देऊ असं काँग्रेस नेता झारखंडमध्ये बोलतोय. जे घुसखोरांना सांभाळतायेत त्यांना देशात कुठे संधी मिळावी का? उघडपणे काँग्रेस नेता ही घोषणा करतो. रोहिंगे, बांगलादेशी यांना स्वस्तात गॅस सिलेंडर देणार. व्होट बँकेसाठी देशातील पुढच्या पिढीच्या भविष्याची खेळ करतायेत याचे हे उदाहरण आहे. काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करण्यात पुढे आहे परंतु देशातील गरिबांची शत्रू आहे. काँग्रेसला रोखण्याचं काम आपल्याला केले पाहिजे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पनवेल येथील सभेत केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसJharkhandझारखंडBJPभाजपा