शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:09 IST

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरीवरून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद निर्माण झाला आहे. 

बोकारो - हिंदू असो, मुस्लीम असो किंवा घुसखोर असो आम्ही काहीही न बघता सर्वांना ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देऊ असं विधान झारखंडमधीलकाँग्रेस प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी केले आहे. घुसखोरांनाही सुविधा देण्याच्या काँग्रेस नेत्याच्या या विधानामुळे ऐन निवडणुकीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवार कुमार जयमंगल यांच्या सभेत लोकांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर यांनी हे वक्तव्य केले आहे.

चंद्रपुरा येथील जाहीर सभेत गुलाम अहमद मीर म्हणाले की, आम्ही हे वचन दिलंय, जर आमचे सरकार बनलं तर १ डिसेंबरपासून ४५० रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध केले जातील. हे सर्वसामान्य लोकांना असेल. मग तो हिंदू असो, मुसलमान असो अथवा घुसखोर असो, झारखंडमधील सर्व लोकांना आम्ही गॅस सिलेंडर देऊ, कुणासोबतही अन्यायकारक विचार आम्ही करणार नाही असं त्यांनी म्हटलं. परंतु या विधानामुळे भाजपा नेते संतप्त झाले आहेत. व्होट बँकेचे राजकारण करत असल्याने राज्यात घुसखोरांना प्रोत्साहन देण्याचं काम काँग्रेस करत आहे असा आरोप करण्यात येत आहे. 

गुलाम अहमद मीर यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी घुमजाव केले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस लोकांमध्ये भेदभाव न करता मदत करते. भाजपा मागील १० वर्षापासून सत्तेत आहे मात्र घुसखोर कोण हे त्यांना ओळखता आले नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही भेदभाव करणार नाही असं गुलाम अहमद मीर यांनी सांगितले. झारखंड विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी घुसखोर हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. नक्षलवाद आणि घुसखोरी यावर भाजपा नेते आक्रमकपणे बोलत आहेत. त्यात काँगेस नेत्याच्या विधानामुळे भाजपाला आयती संधी मिळाली आहे. 

दरम्यान, स्वस्त गॅस सिलेंडर हिंदू, मुस्लीम आणि जे घुसखोर आहेत त्यांनाही देऊ असं काँग्रेस नेता झारखंडमध्ये बोलतोय. जे घुसखोरांना सांभाळतायेत त्यांना देशात कुठे संधी मिळावी का? उघडपणे काँग्रेस नेता ही घोषणा करतो. रोहिंगे, बांगलादेशी यांना स्वस्तात गॅस सिलेंडर देणार. व्होट बँकेसाठी देशातील पुढच्या पिढीच्या भविष्याची खेळ करतायेत याचे हे उदाहरण आहे. काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करण्यात पुढे आहे परंतु देशातील गरिबांची शत्रू आहे. काँग्रेसला रोखण्याचं काम आपल्याला केले पाहिजे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पनवेल येथील सभेत केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसJharkhandझारखंडBJPभाजपा