शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:09 IST

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरीवरून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद निर्माण झाला आहे. 

बोकारो - हिंदू असो, मुस्लीम असो किंवा घुसखोर असो आम्ही काहीही न बघता सर्वांना ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देऊ असं विधान झारखंडमधीलकाँग्रेस प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी केले आहे. घुसखोरांनाही सुविधा देण्याच्या काँग्रेस नेत्याच्या या विधानामुळे ऐन निवडणुकीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवार कुमार जयमंगल यांच्या सभेत लोकांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर यांनी हे वक्तव्य केले आहे.

चंद्रपुरा येथील जाहीर सभेत गुलाम अहमद मीर म्हणाले की, आम्ही हे वचन दिलंय, जर आमचे सरकार बनलं तर १ डिसेंबरपासून ४५० रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध केले जातील. हे सर्वसामान्य लोकांना असेल. मग तो हिंदू असो, मुसलमान असो अथवा घुसखोर असो, झारखंडमधील सर्व लोकांना आम्ही गॅस सिलेंडर देऊ, कुणासोबतही अन्यायकारक विचार आम्ही करणार नाही असं त्यांनी म्हटलं. परंतु या विधानामुळे भाजपा नेते संतप्त झाले आहेत. व्होट बँकेचे राजकारण करत असल्याने राज्यात घुसखोरांना प्रोत्साहन देण्याचं काम काँग्रेस करत आहे असा आरोप करण्यात येत आहे. 

गुलाम अहमद मीर यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी घुमजाव केले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस लोकांमध्ये भेदभाव न करता मदत करते. भाजपा मागील १० वर्षापासून सत्तेत आहे मात्र घुसखोर कोण हे त्यांना ओळखता आले नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही भेदभाव करणार नाही असं गुलाम अहमद मीर यांनी सांगितले. झारखंड विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी घुसखोर हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. नक्षलवाद आणि घुसखोरी यावर भाजपा नेते आक्रमकपणे बोलत आहेत. त्यात काँगेस नेत्याच्या विधानामुळे भाजपाला आयती संधी मिळाली आहे. 

दरम्यान, स्वस्त गॅस सिलेंडर हिंदू, मुस्लीम आणि जे घुसखोर आहेत त्यांनाही देऊ असं काँग्रेस नेता झारखंडमध्ये बोलतोय. जे घुसखोरांना सांभाळतायेत त्यांना देशात कुठे संधी मिळावी का? उघडपणे काँग्रेस नेता ही घोषणा करतो. रोहिंगे, बांगलादेशी यांना स्वस्तात गॅस सिलेंडर देणार. व्होट बँकेसाठी देशातील पुढच्या पिढीच्या भविष्याची खेळ करतायेत याचे हे उदाहरण आहे. काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करण्यात पुढे आहे परंतु देशातील गरिबांची शत्रू आहे. काँग्रेसला रोखण्याचं काम आपल्याला केले पाहिजे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पनवेल येथील सभेत केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसJharkhandझारखंडBJPभाजपा