शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी? उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 08:49 IST

नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान...

नवी दिल्ली - नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, ही दहशतवादी संघटना आता काश्मीर खोऱ्यासह भारतात पाळेमुळे रोवण्याच्या प्रयत्नात असून, भारतीय उपखंडामध्ये एक नवा प्रांत स्थापन केल्याचा दावा या संघटनेने केला आहे. तसेच शुक्रवारी काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ठार केलेला इशफाक अहमद सोफी हा दहशतवादीसुद्धा आयएसशी संबंधित होता, असा दावा या संघटनेने केला आहे.  इस्लामिक स्टेटच्यावतीने एक वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. त्यामध्ये विलाय ए हिंद म्हणजेच भारतीय प्रांताचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र त्यात जम्मू काश्मीरचा उल्लेख करण्यात आलेला नाही. दहशतवादी संघटनेशी संबंधित काही लोकांना सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीवेळी या संदर्भातील माहिती दिली होती.   तसेच इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये तो आपल्या संघटनेचा प्रभाव असलेल्या क्षेत्रांचा उल्लेख करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे इस्लामिक स्टेनने केलेल्या दाव्याबाबतची चिंता वाढली आहे. बगदादीच्या या व्हिडीओत ईस्टर संडे दिवशी श्रीलंकेत घडवून आणलेल्या स्फोटांचाही उल्लेख होता. त्यामुळे इस्लामिक स्टेटच्या कारवायांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सावध भूमिका घेतली असून, या संघटनेच्या प्रत्येक हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष आहे.  आतापर्यंत इस्लामिक स्टेटकडून खोरासान प्रांताचा उल्लेख करण्यात येत असे, त्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या प्रदेशात कारवाया वाढवण्याचा त्याचा प्रयत्न असे.मात्र आता थेट जम्मू काश्मीरमध्ये कारवाया करण्याचे संकेत इस्लामिक स्टेटकडून देण्यात येत आहेत. त्यासाठी या संघटनेकडून स्थानिक दहशतवाद्यांसोबतही वाटाघाटी सुरू आहेत.   

टॅग्स :ISISइसिसJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादIndiaभारत