शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळला; पुन्हा मध्यस्थीसाठी तयार - डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 09:12 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही देश तयार असतील तर आम्ही मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं आहे.

ठळक मुद्दे'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही देश तयार असतील तर आम्ही मध्यस्थीसाठी तयार आहोत'सोमवारी ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला.'दोन्ही देशांची साथ हवी आहे. जर दोन्ही देशांची इच्छा असेल तर आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत'

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही देश तयार असतील तर आम्ही मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी बेलारित्झ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जी 7 संमेलनात भेट झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली. आम्ही पाकिस्तानशी या मुद्द्यावर चर्चा करू आणि तोडगा काढू असं  ट्रम्प यांनी म्हटलं होतं तर दुसरीकडे मोदींनीही त्यांच्यासमोरच पाकला ठणकावलं होतं. पाकिस्तानबरोबर जे मुद्दे आहेत ते द्विपक्षीय आहेत. भारत-पाक द्विपक्षीय संबंधांतून काश्मीर मुद्दा सोडवू, हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाला त्रास देणार नाही. आम्ही चर्चेच्या माध्यमातून या मुद्द्यावर तोडगा काढू, असं आश्वासनही मोदींनी ट्रम्प यांना दिलं होतं. 

'काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे हे सर्वांना माहीत आहे. परंतु दोन आठवड्यांपूर्वी जेवढा तणाव या दोन्ही देशांमध्ये होता तो आता कमी झाला आहे' असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सोमवारी (9 सप्टेंबर) ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी 'दोन्ही देशांची साथ हवी आहे. जर दोन्ही देशांची इच्छा असेल तर आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं आहे. याआधीही भारत पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जुलै महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भारताने हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं सांगत त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. तसेच भारत-पाक द्विपक्षीय संबंधांतून काश्मीर मुद्दा सोडवू, हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाला त्रास देणार नाही. आम्ही चर्चेच्या माध्यमातून या मुद्द्यावर तोडगा काढू असंही मोदींनी सांगितलं होतं.   

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खान