शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

भारत-चीन त्रिस्तरीय चर्चेत युद्धसामग्री हटविण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 06:28 IST

भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

नवी दिल्ली : भारतामध्येचीनविरोधात रोष वाढल्याची झळ आता बीजिंगमध्येही जाणवू लागली आहे. चीनने पहिल्यांदाच त्रिस्तरीय चर्चेची तयारी दर्शवली आहे. भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. याबरोबरच चिनी परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आशिया विभागातील अधिकाऱ्यांना भारतीय दूतावासातील अधिकाºयांना बीजिंगमध्ये चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान, दोन्ही देशांचे सैनिक गलवान खोºयातून मागे हटले असून, गेल्या महिनाभरात सीमेवर तैनात केलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे हटविण्यावर आता चर्चा सुरू होईल. चीनने अत्याधुनिक टँक, तर भारताने अत्याधुनिक रडार सीमेवर तैनात केले आहे.भारत-चीनदरम्यान गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच हिंसक झटापट झाली. त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय जगात उमटले. कोरोनाचे सावट व आशिया खंडातील अशांततेमुळे अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनीसारखे मोठे देशही धास्तावले. भारताने चीनला सडेतोड उत्तर देताना त्यांच्या सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. गेल्या दोन आठवड्यांपासून दोन्ही देशांचे सैनिक वेगवेगळ्या चौक्यांमधून मागे हटत असले तरी युद्धसामग्री अद्याप तेथेच आहे. ज्यात प्रामुख्याने टँक, रडारचा समावेश आहे.चीनने जमवला आहे सीमेवर युद्धसाठाचीनने मोठा युद्धसाठा सीमेवर जमवला आहे. लढाऊ हेलिकॉप्टर, शस्त्रसज्ज सैनिक, बांधकाम साहित्यदेखील पँगाँग सरोवराच्या परिसरात आढळले होते. हेच साहित्य हटविण्याचा आग्रह भारताचा आहे, तरच तणाव निवळेल.च्भारताकडून आर्थिक आघाडीवरही चीनविरोधात मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. चीनसमवेत चर्चा सुरू असली तरी भारताने रशिया व जर्मनीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे खरेदी करण्याचा सौदा निश्चित केला आहे. असे असले तरी चीनने युद्धसाहित्य मागे नेल्यास भारतालाही तसेच करावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत