शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

भारत-चीन त्रिस्तरीय चर्चेत युद्धसामग्री हटविण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 06:28 IST

भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

नवी दिल्ली : भारतामध्येचीनविरोधात रोष वाढल्याची झळ आता बीजिंगमध्येही जाणवू लागली आहे. चीनने पहिल्यांदाच त्रिस्तरीय चर्चेची तयारी दर्शवली आहे. भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. याबरोबरच चिनी परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आशिया विभागातील अधिकाऱ्यांना भारतीय दूतावासातील अधिकाºयांना बीजिंगमध्ये चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान, दोन्ही देशांचे सैनिक गलवान खोºयातून मागे हटले असून, गेल्या महिनाभरात सीमेवर तैनात केलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे हटविण्यावर आता चर्चा सुरू होईल. चीनने अत्याधुनिक टँक, तर भारताने अत्याधुनिक रडार सीमेवर तैनात केले आहे.भारत-चीनदरम्यान गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच हिंसक झटापट झाली. त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय जगात उमटले. कोरोनाचे सावट व आशिया खंडातील अशांततेमुळे अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनीसारखे मोठे देशही धास्तावले. भारताने चीनला सडेतोड उत्तर देताना त्यांच्या सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. गेल्या दोन आठवड्यांपासून दोन्ही देशांचे सैनिक वेगवेगळ्या चौक्यांमधून मागे हटत असले तरी युद्धसामग्री अद्याप तेथेच आहे. ज्यात प्रामुख्याने टँक, रडारचा समावेश आहे.चीनने जमवला आहे सीमेवर युद्धसाठाचीनने मोठा युद्धसाठा सीमेवर जमवला आहे. लढाऊ हेलिकॉप्टर, शस्त्रसज्ज सैनिक, बांधकाम साहित्यदेखील पँगाँग सरोवराच्या परिसरात आढळले होते. हेच साहित्य हटविण्याचा आग्रह भारताचा आहे, तरच तणाव निवळेल.च्भारताकडून आर्थिक आघाडीवरही चीनविरोधात मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. चीनसमवेत चर्चा सुरू असली तरी भारताने रशिया व जर्मनीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे खरेदी करण्याचा सौदा निश्चित केला आहे. असे असले तरी चीनने युद्धसाहित्य मागे नेल्यास भारतालाही तसेच करावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत