शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:53 IST

CDS Anil Chauhan on India-Pakistan Relation : 'आम्ही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत, आता हे युद्ध संपवायचे आहे.'

CDS Anil Chauhan on India-Pakistan Relation : भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी(1 जून) ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताच्या धोरणावर अतिशय स्पष्टपणे भाष्य केले. सिंगापूरमध्ये झालेल्या शांगरी-ला संवाद सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारताच्या ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्ध एक नवीन 'लाल रेषा' आखली आहे. पाकिस्तान भारताच्या लष्करी कारवाईतून नक्कीच काही धडे घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारत-पाक युद्धाच्या उंबरठ्यावरसीडीएस अनिल चौहान पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट करणे होता. त्यानंतर, या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानी हल्ल्यांनाही प्रत्युत्तर देण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते, पण 10 मे रोजी लष्करी कारवाई थांबवण्यासाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला. 

पाकिस्तानच्या आत 300 किमी घुसून हल्ले केलेऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने स्वदेशी शस्त्रे आणि मित्र देशांकडून मिळालेल्या शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानमध्ये 300 किमी आत घुसून हल्ले केले.  हे आमच्या मजबूत हवाई संरक्षण क्षमतेचे प्रतीक आहे. दहशतवाद्यांमुळे जगात अस्थिरता वाढत आहे आणि पाकिस्तान संघर्षांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मला आशा आहे की या विशेष ऑपरेशनमधून आपल्या शत्रूंनाही काही धडे मिळतील आणि ते यापुढे भारताच्या सहनशीलतेचा फायदा घेणार नाहीत, अशी आशाही अनिल चौहान यांनी व्यक्त केली.

यापुढे प्रॉक्सी युद्ध सहन करणार नाहीअनिल चौहान पुढे म्हणतात, आम्ही दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत, यामुळे अनेक लोक गमावले आहेत. आता आम्हाला ते संपवायचे आहे. ऑपरेशननंतर भारताला धोरणात्मक स्थिरता वाटते का असे विचारले असता, सीडीएस म्हणाले की, धोरणात्मक स्थिरता आणण्यासाठी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवाव्या लागतात, असे सूचक विधान त्यांनी केले. 

भारतीय सैन्याचे किती नुकसान?या संभाषणादरम्यान, जनरल चौहान यांनी कबूल केले की, सुरुवातीच्या दिवशी भारताला हवाई नुकसान सहन करावे लागले. पण, त्यांनी कोणताही अचूक आकडा दिला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला झालेल्या नुकसानीशी संबंधित प्रश्नावर अनिल चौहान म्हणाले की, म्हणजे किती नुकसान झाले हे महत्वाचे नाही, तर कोणत्या चुका झाल्या? हे महत्वाचे आहे. आकडेवारी महत्त्वाची नाही, त्यानंतर आपण काय केले हे महत्त्वाचे आहे. आपण युद्धाच्या वातावरणात आहोत आणि नुकसान त्याचाच एक भाग आहे. प्रश्न असा आहे की, आपण आपले उद्दिष्ट साध्य केले आहे का? हो. अद्याप संघर्ष शमलेला नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान