शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:53 IST

CDS Anil Chauhan on India-Pakistan Relation : 'आम्ही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत, आता हे युद्ध संपवायचे आहे.'

CDS Anil Chauhan on India-Pakistan Relation : भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी(1 जून) ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताच्या धोरणावर अतिशय स्पष्टपणे भाष्य केले. सिंगापूरमध्ये झालेल्या शांगरी-ला संवाद सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारताच्या ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्ध एक नवीन 'लाल रेषा' आखली आहे. पाकिस्तान भारताच्या लष्करी कारवाईतून नक्कीच काही धडे घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारत-पाक युद्धाच्या उंबरठ्यावरसीडीएस अनिल चौहान पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट करणे होता. त्यानंतर, या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानी हल्ल्यांनाही प्रत्युत्तर देण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते, पण 10 मे रोजी लष्करी कारवाई थांबवण्यासाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला. 

पाकिस्तानच्या आत 300 किमी घुसून हल्ले केलेऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने स्वदेशी शस्त्रे आणि मित्र देशांकडून मिळालेल्या शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानमध्ये 300 किमी आत घुसून हल्ले केले.  हे आमच्या मजबूत हवाई संरक्षण क्षमतेचे प्रतीक आहे. दहशतवाद्यांमुळे जगात अस्थिरता वाढत आहे आणि पाकिस्तान संघर्षांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मला आशा आहे की या विशेष ऑपरेशनमधून आपल्या शत्रूंनाही काही धडे मिळतील आणि ते यापुढे भारताच्या सहनशीलतेचा फायदा घेणार नाहीत, अशी आशाही अनिल चौहान यांनी व्यक्त केली.

यापुढे प्रॉक्सी युद्ध सहन करणार नाहीअनिल चौहान पुढे म्हणतात, आम्ही दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत, यामुळे अनेक लोक गमावले आहेत. आता आम्हाला ते संपवायचे आहे. ऑपरेशननंतर भारताला धोरणात्मक स्थिरता वाटते का असे विचारले असता, सीडीएस म्हणाले की, धोरणात्मक स्थिरता आणण्यासाठी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवाव्या लागतात, असे सूचक विधान त्यांनी केले. 

भारतीय सैन्याचे किती नुकसान?या संभाषणादरम्यान, जनरल चौहान यांनी कबूल केले की, सुरुवातीच्या दिवशी भारताला हवाई नुकसान सहन करावे लागले. पण, त्यांनी कोणताही अचूक आकडा दिला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला झालेल्या नुकसानीशी संबंधित प्रश्नावर अनिल चौहान म्हणाले की, म्हणजे किती नुकसान झाले हे महत्वाचे नाही, तर कोणत्या चुका झाल्या? हे महत्वाचे आहे. आकडेवारी महत्त्वाची नाही, त्यानंतर आपण काय केले हे महत्त्वाचे आहे. आपण युद्धाच्या वातावरणात आहोत आणि नुकसान त्याचाच एक भाग आहे. प्रश्न असा आहे की, आपण आपले उद्दिष्ट साध्य केले आहे का? हो. अद्याप संघर्ष शमलेला नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान