शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारचा 'मास्टर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 08:36 IST

जागतिक स्तरावर शस्त्र खरेदी आयातमध्ये एकट्या भारताची भागीदारी ११ टक्के इतकी आहे.

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन युद्धाचा(Russia-Ukraine War) आज २१ वा दिवस आहे. या युद्धाचे जगभरात परिणाम होताना पाहायला मिळत आहेत. बलाढ्य रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांनी यूक्रेनला शस्त्र पुरवठा सुरू केला आहे. याचवेळी भारताबाबत स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनं सोमवारी एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार भारत शस्त्र खरेदी स्वावलंबी बनत असल्याचं समोर आलं आहे.

भारताने(India) शस्त्र खरेदीत रशियावर अवलंबून राहणं खूप मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. २०१२-१७ या कालावधीत भारत एकूण शस्त्र खरेदीत ६९ टक्के आयात रशियातून करत होता. परंतु २०१७ ते २०२१ या कालावधीत या आकड्यात घट होऊन ४६ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनं सोमवारी एक रिपोर्ट जारी करत दावा केला की, भारताने २०१७-२०२१ या कालावधीत एकूण आयात शस्त्र खरेदी २१ टक्क्यांनी घट केली आहे. जागतिक स्तरावर शस्त्र खरेदी आयातमध्ये एकट्या भारताची भागीदारी ११ टक्के इतकी आहे.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याकडे पाऊल

२०१२-२०२१ या कालावधीत रशिया भारतासाठी सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार होता. परंतु आता भारताने रशियाकडून होणारा शस्त्र पुरवठा आयात ४७ टक्क्यांनी कमी केला आहे. एसआयपीआरआयनुसार, भारत शस्त्र आणि आधुनिक हत्यारं या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्याशिवाय भारत स्वत: शस्त्रांसाठी कुठल्याही एका देशावर निर्भर न राहण्यासाठी वाटचाल करत आहे. त्यामुळेच २०१७-२१ या काळात भारत फ्रान्स यांच्यात शस्त्र खरेदीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२०१२-२१ या काळात रशियाकडून इजिप्तच्या संरक्षण आयातीत ७३२ टक्क्यांनी वाढ झाली, तर याच कालावधीत चीनची रशियाकडून संरक्षण आयात ६० टक्क्यांनी वाढली. या काळात इजिप्त आणि चीन या दोन्ही देशांना रशियाकडून हवाई संरक्षण यंत्रणा आणि युद्ध विमाने मिळाली आहेत. अहवालानुसार, गेल्या दशकात भारत आणि रशियादरम्यान झालेल्या बहुतांश संरक्षण करारांमध्ये शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, आठ हवाई संरक्षण यंत्रणा, चार फ्रिगेट्स आणि एक आण्विक पाणबुडी रशियाकडून भारताला देण्यात येणार आहे.

सीमेवरील तणावामुळे शस्त्रास्त्र उत्पादन वाढवण्याची योजना

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर सततच्या तणावामुळे, भारत आपले शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवण्याच्या तसेच विविध स्त्रोतांकडून आयात करण्याच्या दीर्घ योजना आखत आहे. भारताच्या एकूण शस्त्रास्त्रांच्या आयातीतील घट प्रत्यक्षात संथ आणि गुंतागुंतीची खरेदी प्रक्रिया आणि पुरवठादारांमधील बदलामुळे झाली आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndiaभारतrussiaरशिया