शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारचा 'मास्टर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 08:36 IST

जागतिक स्तरावर शस्त्र खरेदी आयातमध्ये एकट्या भारताची भागीदारी ११ टक्के इतकी आहे.

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन युद्धाचा(Russia-Ukraine War) आज २१ वा दिवस आहे. या युद्धाचे जगभरात परिणाम होताना पाहायला मिळत आहेत. बलाढ्य रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांनी यूक्रेनला शस्त्र पुरवठा सुरू केला आहे. याचवेळी भारताबाबत स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनं सोमवारी एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार भारत शस्त्र खरेदी स्वावलंबी बनत असल्याचं समोर आलं आहे.

भारताने(India) शस्त्र खरेदीत रशियावर अवलंबून राहणं खूप मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. २०१२-१७ या कालावधीत भारत एकूण शस्त्र खरेदीत ६९ टक्के आयात रशियातून करत होता. परंतु २०१७ ते २०२१ या कालावधीत या आकड्यात घट होऊन ४६ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनं सोमवारी एक रिपोर्ट जारी करत दावा केला की, भारताने २०१७-२०२१ या कालावधीत एकूण आयात शस्त्र खरेदी २१ टक्क्यांनी घट केली आहे. जागतिक स्तरावर शस्त्र खरेदी आयातमध्ये एकट्या भारताची भागीदारी ११ टक्के इतकी आहे.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याकडे पाऊल

२०१२-२०२१ या कालावधीत रशिया भारतासाठी सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार होता. परंतु आता भारताने रशियाकडून होणारा शस्त्र पुरवठा आयात ४७ टक्क्यांनी कमी केला आहे. एसआयपीआरआयनुसार, भारत शस्त्र आणि आधुनिक हत्यारं या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्याशिवाय भारत स्वत: शस्त्रांसाठी कुठल्याही एका देशावर निर्भर न राहण्यासाठी वाटचाल करत आहे. त्यामुळेच २०१७-२१ या काळात भारत फ्रान्स यांच्यात शस्त्र खरेदीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२०१२-२१ या काळात रशियाकडून इजिप्तच्या संरक्षण आयातीत ७३२ टक्क्यांनी वाढ झाली, तर याच कालावधीत चीनची रशियाकडून संरक्षण आयात ६० टक्क्यांनी वाढली. या काळात इजिप्त आणि चीन या दोन्ही देशांना रशियाकडून हवाई संरक्षण यंत्रणा आणि युद्ध विमाने मिळाली आहेत. अहवालानुसार, गेल्या दशकात भारत आणि रशियादरम्यान झालेल्या बहुतांश संरक्षण करारांमध्ये शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, आठ हवाई संरक्षण यंत्रणा, चार फ्रिगेट्स आणि एक आण्विक पाणबुडी रशियाकडून भारताला देण्यात येणार आहे.

सीमेवरील तणावामुळे शस्त्रास्त्र उत्पादन वाढवण्याची योजना

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर सततच्या तणावामुळे, भारत आपले शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवण्याच्या तसेच विविध स्त्रोतांकडून आयात करण्याच्या दीर्घ योजना आखत आहे. भारताच्या एकूण शस्त्रास्त्रांच्या आयातीतील घट प्रत्यक्षात संथ आणि गुंतागुंतीची खरेदी प्रक्रिया आणि पुरवठादारांमधील बदलामुळे झाली आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndiaभारतrussiaरशिया