शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

नितीश कुमारांमुळे तुटणार इंडिया आघाडी? जेडीयूच्या या सल्ल्यानं वाढली काँग्रेसची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 6:03 PM

Nitish Kumar: नुकतीच झालेली जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा आणि नितीश कुमार यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे चर्चेत राहिली. या दोन्ही घटनांच्या चर्चेमध्ये जेडीयूकडून देण्यात आलेला एक महत्त्वाचा सल्ला झाकोळून गेला.

नुकतीच झालेली जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा आणि नितीश कुमार यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे चर्चेत राहिली. या दोन्ही घटनांच्या चर्चेमध्ये जेडीयूकडून देण्यात आलेला एक महत्त्वाचा सल्ला झाकोळून गेला. मात्र आता तो चर्चेचा विषय बनला आहे. तसेच येणाऱ्या काळासाठी त्यातून महत्त्वाचा संकेतही मिळत आहे.

इंडिया आघाडीमध्ये अशा नेत्याकडे जबाबदारी देण्यात यावी जो अनुभवी आणि कार्यक्षम असेल, असा सल्ला जेडीयूकडून देण्यात आला होता. मोठ्या पक्षाने उदार बनण्याची गरज असल्याचा सल्लाही जेडीयूकडून काँग्रेसचं नाव न घेता देण्यात आला आहे.

इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये जेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं. ही बाब जेडीयूला रुचली नव्हती. जेडीयूने यावर आक्षेपही नोंदवला होता.

आता नितीश कुमार यांच्या उपस्थितीत अनुभव आणि कार्यक्षमतेच्या अनुरूप कुठल्याही नेत्याला इंडिया आघाडीचं नेतृत्व देण्यात आलं पाहिजे, अशी चर्चा जेडीयूकडून सुरू करण्यात आली आहे. नितीश कुमार हे देशातील पर्यायी राजकारणाचे प्रस्तावक आहेत. इंडिया आघाडीच्या सर्व बैठकांमध्ये त्यांनी इंडिया आघाडीचं सूत्रधार म्हटलं जातं, असे जेडीयूनं म्हटलं आहे.

जेडीयूने स्पष्टपणे सांगितलं की, जर या महाआघाडीला यशस्वी व्हायचं असेल तर मोठ्या पक्षांना मोठं मन दाखवावं लागेल. दरम्यान, पुढील घडामोडींचे संकेत देणाऱ्या जेडीयूच्या सल्ल्यानंतर बिहारमधील महाआघाडीच्या जागावाटपाबाबत पुढील आठवड्यात चर्चा होणार आहे. बिहारमधील जुन्या आकड्यांवरून सर्व काही निश्चित मानले जात आहे. आपल्याला कोणकोणत्या जागा मिळतील याबाबतही जेडीयूमध्ये चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस