शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
4
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
5
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
6
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
7
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
8
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
9
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
10
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
11
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
12
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
13
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
15
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
16
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
17
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
18
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
19
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 06:43 IST

India-Pakistan Relation: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले.

इस्लामाबाद  - पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले.

सिंधू जल कराराच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अशी काही घडामोड झाली का याबाबत दोन्ही देशांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. जम्मूमधील तवी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता भारताने व्यक्त करून पाकिस्तानला सावधानतेचा इशारा दिला. ही माहिती इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाने रविवारी पाकिस्तान सरकारला दिली. मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर भारताने पाकिस्तानशी प्रथमच महत्त्वाच्या कामासाठी संपर्क साधला आहे.

नागरिक झाले सतर्कराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पाकमध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. पुरामुळे नागरिक सतर्क झाले आहेत.७८८ पाकिस्तानी नागरिकांचा २६ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत पावसाने मृत्यू.

सतर्क राहण्याचा इशारा ‘राजनैतिक’ का दिला?भारताने आम्हाला संभाव्य पूरस्थितीबाबत सतर्कतेचा इशारा दिला, अशी माहिती पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिली. मात्र, ही सूचना सिंधू जल करारांतर्गत नेमलेल्या जल आयोगामार्फत न देता, राजनैतिक स्तरावरून देण्यात आली, असे सांगत त्या देशाने नवी कुरापत काढली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान म्हणाले, भारताने तवी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याचा व सतर्क राहण्याचा इशारा राजनैतिक माध्यमातून पाकिस्तानला पाठविला. अशा प्रकारे सूचना देणे हे सिंधू जल कराराचे उल्लंघन आहे. 

दहशतवादी, सूत्रधारांना आम्ही सोडत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथे सांगितले की, दहशतवादी व त्यांच्याकडून घातपाती कृत्ये करवून घेणाऱ्या सूत्रधारांवर भारताने कठोर कारवाई केली आहे.  रतीय लष्कराच्या शूर जवानांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर अचूक हल्ले चढविले. आम्ही त्या तळांतील दहशतवाद्यांचा नायनाट केला. पहलगाम हल्ल्याचा भारताने कसा बदला घेतला हे साऱ्या जगाने पाहिले आहे. आम्ही अवघ्या २२ मिनिटांत ही कारवाई पार पाडली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानfloodपूर