शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
3
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
4
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
5
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
6
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
7
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
8
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
9
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
10
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
11
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
12
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
13
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
14
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
15
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
16
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
17
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
18
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
19
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
20
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 06:43 IST

India-Pakistan Relation: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले.

इस्लामाबाद  - पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले.

सिंधू जल कराराच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अशी काही घडामोड झाली का याबाबत दोन्ही देशांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. जम्मूमधील तवी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता भारताने व्यक्त करून पाकिस्तानला सावधानतेचा इशारा दिला. ही माहिती इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाने रविवारी पाकिस्तान सरकारला दिली. मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर भारताने पाकिस्तानशी प्रथमच महत्त्वाच्या कामासाठी संपर्क साधला आहे.

नागरिक झाले सतर्कराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पाकमध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. पुरामुळे नागरिक सतर्क झाले आहेत.७८८ पाकिस्तानी नागरिकांचा २६ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत पावसाने मृत्यू.

सतर्क राहण्याचा इशारा ‘राजनैतिक’ का दिला?भारताने आम्हाला संभाव्य पूरस्थितीबाबत सतर्कतेचा इशारा दिला, अशी माहिती पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिली. मात्र, ही सूचना सिंधू जल करारांतर्गत नेमलेल्या जल आयोगामार्फत न देता, राजनैतिक स्तरावरून देण्यात आली, असे सांगत त्या देशाने नवी कुरापत काढली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान म्हणाले, भारताने तवी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याचा व सतर्क राहण्याचा इशारा राजनैतिक माध्यमातून पाकिस्तानला पाठविला. अशा प्रकारे सूचना देणे हे सिंधू जल कराराचे उल्लंघन आहे. 

दहशतवादी, सूत्रधारांना आम्ही सोडत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथे सांगितले की, दहशतवादी व त्यांच्याकडून घातपाती कृत्ये करवून घेणाऱ्या सूत्रधारांवर भारताने कठोर कारवाई केली आहे.  रतीय लष्कराच्या शूर जवानांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर अचूक हल्ले चढविले. आम्ही त्या तळांतील दहशतवाद्यांचा नायनाट केला. पहलगाम हल्ल्याचा भारताने कसा बदला घेतला हे साऱ्या जगाने पाहिले आहे. आम्ही अवघ्या २२ मिनिटांत ही कारवाई पार पाडली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानfloodपूर