शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

भारताची आरोग्य सेवा बिघडलेलीच

By admin | Updated: April 16, 2016 03:23 IST

मुंबईसारख्या महानगरात अनेक मोठी रुग्णालये आहेत. जगभरातील रुग्ण उपचारासाठी मुंबईत येतात. दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये एम्ससारख्या अद्ययावत रुग्णालयाची

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीमुंबईसारख्या महानगरात अनेक मोठी रुग्णालये आहेत. जगभरातील रुग्ण उपचारासाठी मुंबईत येतात. दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये एम्ससारख्या अद्ययावत रुग्णालयाची सोय आहे तरीही भारतात आरोग्य सेवेची स्थिती अत्यंत दयनीय आहे. नॅशनल सँपल सर्व्हेने देशाच्या आरोग्य सेवांबाबत नुक त्याच जारी केलेल्या अहवालातून हे वास्तव सामोरे आले आहे. सर्व्हेच्या अहवालानुसार देशात आरोग्य विम्याची तरतूद अवघ्या १६ टक्के लोकांकडे आहे. म्हणजेच उपचारांसाठी ८४ टक्के लोकसंख्येकडे कोणताही खासगी अथवा सरकारी विमा नाही.या अहवालातील निष्कर्ष चिंताजनक आहेत. आजारपणासाठी ग्रामीण भारतातल्या ८६ टक्के लोकसंख्येला आरोग्य विमा अथवा अन्य कोणत्याही योजनेचा आंशिक लाभ देखील मिळत नाही. शहरांमध्ये ८२ टक्के लोकसंख्येकडे आरोग्य विमा नाही. जागोजागच्या सरकारी रुग्णालयांची अवस्था दयनीय आहे. खाजगी रुग्णालयांच्या उपचारांचा खर्च महागडा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य विमा नसलेल्या ६८ टक्के कुटुंबांनी आणि शहरांत ७५ टक्के कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या संचित रकमेतून उपचारांचा खर्च केला. ग्रामीण भागांत २५ टक्के आणि शहरांत १८ टक्के कुटुंबांना औषधोपचार व रुग्णालयांच्या खर्चासाठी अक्षरश: कर्ज काढावे लागले.नव्या आरोग्य विमा योजनेचा विचार?या अहवालानुसार मेडिक्लेमसाठी शहरांतील ३.५ टक्के लोकांनी आणि ग्रामीण भागांतील 0.३ टक्के लोकांनी विविध विमा कंपन्यांकडून आपला व कुटुंबियांचा आरोग्य सेवा विमा काढला आहे. शहरांत २.४ टक्के चाकरमान्यांचा आरोग्य विमा संबंधित खासगी कंपन्या अथवा कार्यालयांमार्फत काढला आहे. ग्रामीण भागात मात्र याची टक्केवारी अवघी 0.६ टक्के आहे. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (आरएसबीवाय) सुरू केली. मात्र आतापर्यंत केवळ १३ टक्के ग्रामीण व १२ टक्के शहरी कुटुंबांना त्याचा लाभ मिळाला. या योजनेत संपूर्ण कुटुंबाच्या उपचारासाठी अवघ्या ३0 हजारांची मदत मिळत होती. तरीही आरोग्य सेवेत ही एकमात्र सरकारी योजना अशी होती की देशातल्या जनतेला काही अंशी तरी त्याचा लाभ झाला. त्यामुळे केंद्र सरकारने या योजनेऐवजी आता व्यापक आरोग्य विमा योजना सुरू करण्याचे ठरवले आहे, असे समजते.