शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदींच्या संकल्पासाठी तरूणांनी पुढं यावं, देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं - गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 17:04 IST

भाजपा खासदार गौतम गंभीरने देशातील तरूणाईला एक आवाहन केले आहे.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीरने देशातील तरूणाईला एक आवाहन केले आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यायला हवा, असे गंभीरने आवाहन केले. तो त्याच्या दिल्ली पूर्व या लोकसभा मतदारसंघात 'नमो न्यू व्होटर्स कॉन्फरन्स'ला संबोधित करताना बोलत होता. युवा मतदार हा देशाच्या चांगल्या भविष्याचा पाया रचेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. 

तसेच संपूर्ण जगात सर्वाधिक युवा मतदार हा भारतात आहे. भारत ७ लाख कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेचा आकार गाठेल कारण लोक आता विकासाबद्दल भाष्य करत असून पूर्वी झालेल्या घोटाळ्यांच्या चर्चा होत आहेत, ते उघडकीस येत आहेत. भारतातील तरुण देशाचे आणि जगाच्या मोठ्या भागाचे भविष्य ठरवतील यात शंका नाही. देशाच्या निर्णय प्रक्रियेत तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. समस्या आपल्याच असतील तर त्यावर तोडगा देखील आपणच काढायला हवा, असे गंभीरने नमूद केले. 

यावेळी गौतम गंभीरने पहिल्यांदाच मतदान करणार असलेल्या युवा मतदारांना पदक देऊन सन्मानित केले. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून तो समालोचनाकडे वळला आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी त्याची कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात घरवापसी झाली आहे. गंभीर आयपीएल २०२४ मध्ये केकेआरच्या संघाला मार्गदर्शन करताना दिसेल.

'आप'वर गंभीरची टीकागौतम गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा दाखला देत दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीला लक्ष्य केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केवळ मतांसाठी राजकारण करतात, अशी टीका त्यांनी केली. दिल्ली सरकारच्या सोलर पॉलिसीबद्दल गंभीर म्हणाला की, अरविंद केजरीवाल फक्त मतांचे राजकारण करतात. वीज आणि पाण्यानंतर आता ते सोलरवर बोलत आहेत, हे सर्व फक्त मतांसाठी सुरू आहे. जोपर्यंत व्होट बँकेचे राजकारण आहे, तोपर्यंत दिल्लीतील जनता प्रदूषणाशी अशीच झुंज देत राहणार आहे. व्होट बँकेचे राजकारण असेल तर दिल्ली आणि देशाचा विकास होणार नाही. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्लीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ