शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

Gissar Military Aerodrome: असा आहे भारताचा परदेशातील पहिला एअरबेस, अफगाणिस्तानमधील मदतकार्यात बजावली महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:52 IST

Gissar Military Aerodrome: अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांना सुखरूपपणे मायदेशात आणण्याच्या मोहिमेमध्ये भारताच्या परदेशातील पहिल्या एअरबेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.

नवी दिल्ली - रविवार १५ ऑगस्ट रोजी तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला होता. त्याबरोबरच अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली. दरम्यान, तालिबानच्या हातात सत्तासूत्रे आल्यानंतर अनेक जणांनी अफगाणिस्तान सोडून बाहेरील देशांत आश्रय घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे. (Gissar Military Aerodrome) भारतानेही अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना देशात परत आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांना सुखरूपपणे मायदेशात आणण्याच्या मोहिमेमध्ये भारताच्या परदेशातील पहिल्या एअरबेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. (This is India's first overseas airbase, playing an important role in relief work in Afghanistan)

भारतीयांना मायदेशात आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या एअरबेसचे नाव आहे गिसार मिलिल्ट्री एरोड्रम. हा एअरबेस मध्य आशियातील ताजिकिस्तान या देशात आहे. हा एअरबेस अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या अगजी सीमारेषेवर आहे. गेल्या दोन दशकांपासून या एअरबेसचे प्रशासन भारत आणि ताजिकिस्तान संयुक्तरीत्या पाहत आहेत.

गिसार मिलिट्री एरोड्रम हा भारताचा परदेशातील पहिला एअरबेस आहे. हा एअरबेस लष्करी आणि अन्य कामांसाठी ताजिकिस्तान आणि भारताकडून संयुक्तरीत्या चालवला जातो. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काबुलमधून शेकडो भारतीयांना बाहेर काढताना या एअरबेसचे भौगोलिक स्थान उपयुक्त ठरले.

हा एअरबेस जीएमए अयानी एअरबेस या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. हा एअरबेस ताजिकिस्तानची राजधानी दुशन्बेपासून १० किलोमीटक पश्चिमेस अयानी नावाच्या गावामध्ये आहे. या एअरबेसच्या स्थापनेमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि भारतीय हवाईदलाचे माजी प्रमुख बीएस धनोआ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच्या निर्मितीचा खर्च परराष्ट्र मंत्रालयाने उचलला होता.

अफगाणिस्तानमध्ये अंधाधुंदी माजल्यानंतर ए सी -१३० या विमानाने ८७ भारतीयांना काबुलमधून ताजिकिस्तानमध्ये सुरक्षितपणे आणले होते. त्यानंतर हे नागरिक एअर इंडियाच्या विमानामधून भारतात पोहोचले होते. काबुलमध्ये माजलेल्या अंधाधुंदीच्या पार्श्वभूमीवर सी-१७ विमान जीएमएवरच ठेवण्यात आले होते.  

टॅग्स :Indiaभारतindian air forceभारतीय हवाई दलInternationalआंतरराष्ट्रीयAfghanistanअफगाणिस्तान