शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Gissar Military Aerodrome: असा आहे भारताचा परदेशातील पहिला एअरबेस, अफगाणिस्तानमधील मदतकार्यात बजावली महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:52 IST

Gissar Military Aerodrome: अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांना सुखरूपपणे मायदेशात आणण्याच्या मोहिमेमध्ये भारताच्या परदेशातील पहिल्या एअरबेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.

नवी दिल्ली - रविवार १५ ऑगस्ट रोजी तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला होता. त्याबरोबरच अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली. दरम्यान, तालिबानच्या हातात सत्तासूत्रे आल्यानंतर अनेक जणांनी अफगाणिस्तान सोडून बाहेरील देशांत आश्रय घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे. (Gissar Military Aerodrome) भारतानेही अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना देशात परत आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांना सुखरूपपणे मायदेशात आणण्याच्या मोहिमेमध्ये भारताच्या परदेशातील पहिल्या एअरबेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. (This is India's first overseas airbase, playing an important role in relief work in Afghanistan)

भारतीयांना मायदेशात आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या एअरबेसचे नाव आहे गिसार मिलिल्ट्री एरोड्रम. हा एअरबेस मध्य आशियातील ताजिकिस्तान या देशात आहे. हा एअरबेस अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या अगजी सीमारेषेवर आहे. गेल्या दोन दशकांपासून या एअरबेसचे प्रशासन भारत आणि ताजिकिस्तान संयुक्तरीत्या पाहत आहेत.

गिसार मिलिट्री एरोड्रम हा भारताचा परदेशातील पहिला एअरबेस आहे. हा एअरबेस लष्करी आणि अन्य कामांसाठी ताजिकिस्तान आणि भारताकडून संयुक्तरीत्या चालवला जातो. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काबुलमधून शेकडो भारतीयांना बाहेर काढताना या एअरबेसचे भौगोलिक स्थान उपयुक्त ठरले.

हा एअरबेस जीएमए अयानी एअरबेस या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. हा एअरबेस ताजिकिस्तानची राजधानी दुशन्बेपासून १० किलोमीटक पश्चिमेस अयानी नावाच्या गावामध्ये आहे. या एअरबेसच्या स्थापनेमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि भारतीय हवाईदलाचे माजी प्रमुख बीएस धनोआ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच्या निर्मितीचा खर्च परराष्ट्र मंत्रालयाने उचलला होता.

अफगाणिस्तानमध्ये अंधाधुंदी माजल्यानंतर ए सी -१३० या विमानाने ८७ भारतीयांना काबुलमधून ताजिकिस्तानमध्ये सुरक्षितपणे आणले होते. त्यानंतर हे नागरिक एअर इंडियाच्या विमानामधून भारतात पोहोचले होते. काबुलमध्ये माजलेल्या अंधाधुंदीच्या पार्श्वभूमीवर सी-१७ विमान जीएमएवरच ठेवण्यात आले होते.  

टॅग्स :Indiaभारतindian air forceभारतीय हवाई दलInternationalआंतरराष्ट्रीयAfghanistanअफगाणिस्तान