शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

'भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत...', पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने केले राजनाथ सिंह यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 20:46 IST

भारतीय नौदलात आण्विक पाणबुडी INS अरिघाट सामील झाली आहे.

India on Terrorism : दहशतवादाला प्रोत्साहन देणारा पाकिस्तान आणि भारतीय भूमीवर कब्जा करणाऱ्या चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. या अंतर्गत गुरुवारी(29 ऑगस्ट) अरिहंत वर्गाची दुसरी आण्विक पाणबुडी, INS अरिघाट विशाखापट्टणम येथील नौदल ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. दरम्यान, आता यावरुन पाकिस्तान आणि चीनचे सुरक्षा तज्ज्ञ भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे कौतुक करत आहेत.

पाकिस्तानने संरक्षण मंत्री काय म्हणाले?भारताच्या वाढत्या आण्विक सामर्थ्यावर पाकिस्तानी संरक्षण तज्ञ कमर चीमा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, जमीन, समुद्र आणि आकाश या तिन्ही ठिकाणांहून भारत अण्वस्त्र हल्ले करू शकतो. आपली सुरक्षा लक्षात घेऊन भारत तिन्ही सैन्यात मोठी गुंतवणूक करत आहे. भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत. भारताने हा संदेशही दिला आहे की, पीएम मोदी फक्त एकच आण्विक पाणबुडी घेऊन येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया कमर चीमाने दिली.

कशी आहे पाणबुडीअरिहंत वर्गाची दुसरी पाणबुडी अरिघाटाची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे आणि ही अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली आणि उपकरणांनी सुसज्ज आहे. याची लांबी 112 मीटर, रुंदी 11 मीटर आणि वजन सुमारे 6 हजार टन आहे. ही घातक K-15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून, याची मारक क्षमता 750 किलोमीटरपर्यंत आहे. मात्र, यातून आपल्या देशाला कोणताही धोका नसल्याचा दावाही पाकिस्तानी तज्ज्ञांनी केला आहे.

भारताच्या सामर्थ्याला चीनही घाबरलाचीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनेही आयएनएस अरिघाटबद्दल एक लेख लिहिला आहे. या लेखाच्या मथळ्यात भारताने या आण्विक क्षेपणास्त्र पाणबुडीचा जबाबदारीने वापर करायला हवा, असे लिहिले आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखात लिहिले की, अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्यांमुळे भारताची अणुशक्ती वाढली आहे. याचा उपयोग शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी केला पाहिजे, ताकद दाखवण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी नाही.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतindian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तान