शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भारताची ‘अंतराळशक्ती’ अधिक सामर्थ्यशाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 2:08 AM

क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.

नवी दिल्ली : क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.शत्रूच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा ‘डीआरडीओ’चा एक कार्यक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आक्रमक क्षेपणास्त्र वाटेतच रोखणाची क्षमता सिद्ध करण्यात आली आहे. याच ‘इन्टरसेप्टर’ क्षमतेचा उपयोग ‘मिशन शक्ती’मध्ये केला गेला.संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आखलेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या या मिशनचा मुख्य उद्देश कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमाने विकसित केलेली पूर्णपणे देशी तंत्रशास्त्रीय क्षमता प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध करणे हा होता. मिशन यशस्वी झाल्याने भारत अंतराळात उपग्रहांच्या स्वरूपात असलेल्या आपल्या बहुमोल साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासही सक्षम असल्याचा इशारेवजा संदेशही यातून दिला गेला. आज उपग्रह नष्ट करण्यासाठी वापरले गेलेल्या याच तंत्रज्ञानाने भारत शत्रूने सोडलेली क्षेपणास्त्रेही लक्ष्यावर पोहोचण्यापूर्वीच रोखून नष्ट करू शकतो, हेही यामुळे अधोरेखित झाले.भारताने आतापर्यंत १०२ प्रक्षेपणे करून विविध प्रकारचे शेकडो उपग्रह अंतराळात सोडले आहेत. शिवाय ‘चांद्रयान’ व ‘मंगळयान’ या बाह्य अवकाशातील महत्त्वाकांक्षी मोहिमाही भारत हाती घेत आहे. यासाठी अंतराळ बाह्य धोक्यांपासून निर्धोक असणे व संभाव्य धोके परिणामकारकपणे परतवून लावण्याची क्षमता असणे देशाच्या सर्वंकष संरक्षण सिद्धतेचा एक अविभाज्य भाग आहे.नष्ट झालेल्या उपग्रहाचे काय होणार?अशा प्रकारे उपग्रह नष्ट केल्याने अंतराळात कचरा विखरून इतर उपग्रहांना व यानांना अडथळा येऊ नये याची काळजी घेतली गेली. याच उद्देशाने पृथ्वीपासून जवळच्या कक्षेतील उपग्रह ‘लक्ष्य’ म्हणून निवडला गेला.परिणामी, त्याचे भग्नावशेष गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीकडे येतील व वातावरणाच्या घर्षणानेच बव्हंशी नष्ट होतील.

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्ती