शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ, भारताची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 15:18 IST

Indira Gandhi: कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गाधी यांच्या हत्येचा चित्ररथ फिरवण्यात आल्याचा घटनेबाबत भारत सरकारने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगली नसल्याचे खडेबोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहेत.

कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गाधी यांच्या हत्येचा चित्ररथ फिरवण्यात आल्याचा घटनेबाबत भारत सरकारने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगली नसल्याचे खडेबोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहेत. मला वाटतं की, यामध्ये एका मोठा मुद्दा समाविष्ट आहे, स्पष्टपणे सांगायचं तर व्होटबँकेच्या राजकारणाशिवाय असं कोण कशाला करेल, असा प्रश्न जयशंकर यांनी उपस्थित केला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, मला वाटतं की, हा एक मोठा अंतर्निहित मुद्दा आहे. त्या स्थानाबाबत जे फुटिरतावादी, कट्टरतावादी, हिंसाचाराचं समर्थन करणारे यांना दिलं जातं. मला वाटतं की,हे दोन देशांच्या संबंधांसाठी चांगलं नाही आहे. तसेच कॅनडासाठीही चांगलं नाही आहे.

यादरम्यान, काँग्रेसने कॅनडामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दाखवत काढलेल्या कथित चित्ररथाच्या घटनेचा निषेध करत भारत सरकारने हा मुद्दा कॅनडासमोर सक्षमपणे मांडावा, अशी मागणी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून एस. जयशंकर यांच्याकडे ही मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार कॅनडामधील बेम्पटन येथे खलिस्तान समर्थकांनी हल्लीच इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दाखवणारा चित्ररथ फिरवला होता. त्याचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्निट केलं की, कॅनडाच्या ब्रेम्पटन येथे पाच किलोमीटर लांबीची रॅली काढण्यात आली, ज्यात इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ दाखवण्यात आला, हे पाहून एक भारतीय म्हणून मला वेदना झाल्या. हा कुणाची बाजू घेणयाचा विषय नाही आहे. तर राष्ट्राचा इतिहास आणि माजी पंतप्रधानांच्या हत्येमुळे झालेल्या वेदनेच्या सन्मानाची बाब आहे.

देवरा पुढे म्हणाले की, कट्टरतावादाचा सार्वत्रिकपणे निषेध केला गेला पाहिजे. तसेच त्याचा मिळून सामना केला पाहिजे. देवरा यांचं हे ट्विट रीट्विट करत जयराम रमेश यांनी या विधानाशी मी पूर्णपणे सहमत असल्याचे सांगितले. तसेच कॅनडासमोर हा मुद्दा सक्षमपणे मांडला जावा, अशी मी जयशंकर यांच्याकडे मागणी करतो, असेही रमेश म्हणाले.  

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारतCanadaकॅनडाS. Jaishankarएस. जयशंकर