शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ, भारताची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 15:18 IST

Indira Gandhi: कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गाधी यांच्या हत्येचा चित्ररथ फिरवण्यात आल्याचा घटनेबाबत भारत सरकारने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगली नसल्याचे खडेबोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहेत.

कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गाधी यांच्या हत्येचा चित्ररथ फिरवण्यात आल्याचा घटनेबाबत भारत सरकारने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगली नसल्याचे खडेबोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहेत. मला वाटतं की, यामध्ये एका मोठा मुद्दा समाविष्ट आहे, स्पष्टपणे सांगायचं तर व्होटबँकेच्या राजकारणाशिवाय असं कोण कशाला करेल, असा प्रश्न जयशंकर यांनी उपस्थित केला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, मला वाटतं की, हा एक मोठा अंतर्निहित मुद्दा आहे. त्या स्थानाबाबत जे फुटिरतावादी, कट्टरतावादी, हिंसाचाराचं समर्थन करणारे यांना दिलं जातं. मला वाटतं की,हे दोन देशांच्या संबंधांसाठी चांगलं नाही आहे. तसेच कॅनडासाठीही चांगलं नाही आहे.

यादरम्यान, काँग्रेसने कॅनडामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दाखवत काढलेल्या कथित चित्ररथाच्या घटनेचा निषेध करत भारत सरकारने हा मुद्दा कॅनडासमोर सक्षमपणे मांडावा, अशी मागणी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून एस. जयशंकर यांच्याकडे ही मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार कॅनडामधील बेम्पटन येथे खलिस्तान समर्थकांनी हल्लीच इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दाखवणारा चित्ररथ फिरवला होता. त्याचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्निट केलं की, कॅनडाच्या ब्रेम्पटन येथे पाच किलोमीटर लांबीची रॅली काढण्यात आली, ज्यात इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ दाखवण्यात आला, हे पाहून एक भारतीय म्हणून मला वेदना झाल्या. हा कुणाची बाजू घेणयाचा विषय नाही आहे. तर राष्ट्राचा इतिहास आणि माजी पंतप्रधानांच्या हत्येमुळे झालेल्या वेदनेच्या सन्मानाची बाब आहे.

देवरा पुढे म्हणाले की, कट्टरतावादाचा सार्वत्रिकपणे निषेध केला गेला पाहिजे. तसेच त्याचा मिळून सामना केला पाहिजे. देवरा यांचं हे ट्विट रीट्विट करत जयराम रमेश यांनी या विधानाशी मी पूर्णपणे सहमत असल्याचे सांगितले. तसेच कॅनडासमोर हा मुद्दा सक्षमपणे मांडला जावा, अशी मी जयशंकर यांच्याकडे मागणी करतो, असेही रमेश म्हणाले.  

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारतCanadaकॅनडाS. Jaishankarएस. जयशंकर