शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

भारतीयांचं सरासरी वय वाढलं, 1970 मध्ये 47 वर्षांपर्यंत जगायचे लोक, आता झालं एवढं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:09 IST

या अहवालात म्हणण्यात आले आहे, की भारतीयांचे सरासरी वय तर वाढले आहे, पण उपचारांचा खर्च लोकांच्या बजेट बाहेर जात आहे. एकूणच, भारताने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. मात्र, अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे.

डब्ल्यूएचओने (WHO) नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारत आजारांचा सामना करण्यात पूर्वीच्या तुलनेत आता अधिक चांगली कामगिरी करत आहे. याच बरोबर, भारतात आजारांचे प्रकार बदलले असल्याचा दावाही करण्यात आला आहे. इंडिया हेल्थ सिस्टिम रिव्ह्यू (India Health System Review) नावाच्या या अहवालात भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा लेखाजोखा देण्यात आला आहे.

अहवालात अनेक खुलासे - या अहवालात म्हणण्यात आले आहे, की भारतीयांचे सरासरी वय तर वाढले आहे, पण उपचारांचा खर्च लोकांच्या बजेट बाहेर जात आहे. एकूणच, भारताने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. मात्र, अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे.

भारतीयांच्या सरासरी वयात मोठी सुधारणा -भारतात 1970 मध्ये लोक 47 वर्षांपर्यंत जगत होते, आता (2020च्या आकडेवारीनुसार) भारतीयांचे सरासरी वय 70 वर्षं झाले आहे. महिलांचे सरासरी वय 24 वर्षांनी वाढले आहे तर पुरुषांचे वय 20 वर्षांनी वाढले आहे. यानुसार भारतातील महिलांचे सरासरी वय 71 वर्षे आणि पुरुषांचे सरासरी वय 68 वर्षे आहे. श्रीलंकेतील सरासरी वय 74 वर्षे असून चीनमध्ये सरासरी वय 75 वर्षे आहे.  

नवजात बालकांच्या मृत्यूच्या आकडेवारीतही सुधारणा -या अहवालानुसार, 1970 मध्ये 1000 बालकांपैकी 132 बालकांचा जन्माला येताच मृत्यू होत होता. मात्र, आता या आकड्यातही मोठी सुधारणा झाली आहे. 2020 च्या आकडेवारीनुसार, 1000 पैकी 32 नवजात बालकांचा मृत्यू होतो. तसेच, प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही घट झाली आहे. 1990 च्या आकडेवारीनुसार 10 हजारांपैकी 556 महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. मात्र, 2018 पर्यंत हा आकडा कमी होऊन 10 हजारपैकी 113 वर आला आहे.

पब्लिक हेल्थवर कमी खर्च करतो भारत - याचप्रमाणे, भारतात 10 हजार लोकांमागे 9.28 टक्के डॉक्टर आणि 24 परिचारिका आहेत. याच बरोबर 10 हजार लोकांमागे 9 फार्मासिस्ट असल्याचेही अहवालात म्हटले आहे. भारतात सार्वजनिक आरोग्यावर फार कमी खर्च करतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारतHealthआरोग्यMedicalवैद्यकीय