शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

भारतीय जवानांना मारा, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:51 IST

जम्मू काश्मीरमध्ये यावर्षी भारतीय जवानांनी 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून 'ऑपरेशन ऑल आउट' सुरू करण्यात आले असून या अंतर्गत यावर्षी भारतीय जवानांनी 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्करी अधिकार्यांना ठार मारण्याचे आदेश पाकिस्तानने दहशतवाद्यांना दिला आहे.

निम-लष्करी जवानांना आणि भारतीय जवानांना मुख्यत: पहिल्यांदा लक्ष करण्याच्या सुचना पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना दिल्या आहेत.  भारतीय जवानांना लक्ष केल्यास  नियंत्रण रेषा ओलांडता येईल हा त्यामागील उद्देश आहे. भारतीय जवानांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष करण्याचे आदेश पाकिस्तानडून देण्यात आल्याचे वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे.

ताज्या रिपोर्टनुसार 49 दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.  उरी, नौगम, नौशेरा आणि पुंछ या भागामधून जास्तीत दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात आहेत.  गुरेझ, मचल, केरन, तांगधर आणि रामपूर ही ठीकाणं दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत. 

काल पाकिस्तानमधील अल-कायदा या अतिरेकी संघटनेने एक व्हिडिओ व्हायरल करून भारताविरुद्ध युद्ध छेडण्यासाठी अतिरेक्यांना डिवचलं आहे. काश्मीर जिंकायचे असेल तर भारतातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांवर हल्ला करा,' अशी चिथावणीच अल-कायदानं अतिरेक्यांना दिली आहे. जिहादी फोरम या ऑनलाइन साइटवर अलकायदाकडून भारताविरोधी व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. अलकायदाचा एक प्रमुख नेता उसामा महमूद याने हा भारताविरोधात गरळ ओकणारा व्हिडिओ जारी केला आहे. काश्मीरवर वर्चस्व ठेवण्यासाठी भारत काश्मिरात ६ लाख सैनिकांचा वापर करत आहे. अशा वेळी कोलकाता, बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतातील बड्या आणि महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केल्यास भारताचं लक्ष काश्मीरवरून विचलीत होईल. त्यांचं काश्मीरवरचं वर्चस्व कमी होईल आणि आपल्याला काश्मिरात मजबूत संघटन उभारता येईल,  असं उसामाने या व्हिडिओत म्हटलं आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद