शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भारतीय जवानांना मारा, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:51 IST

जम्मू काश्मीरमध्ये यावर्षी भारतीय जवानांनी 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून 'ऑपरेशन ऑल आउट' सुरू करण्यात आले असून या अंतर्गत यावर्षी भारतीय जवानांनी 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्करी अधिकार्यांना ठार मारण्याचे आदेश पाकिस्तानने दहशतवाद्यांना दिला आहे.

निम-लष्करी जवानांना आणि भारतीय जवानांना मुख्यत: पहिल्यांदा लक्ष करण्याच्या सुचना पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना दिल्या आहेत.  भारतीय जवानांना लक्ष केल्यास  नियंत्रण रेषा ओलांडता येईल हा त्यामागील उद्देश आहे. भारतीय जवानांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष करण्याचे आदेश पाकिस्तानडून देण्यात आल्याचे वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे.

ताज्या रिपोर्टनुसार 49 दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.  उरी, नौगम, नौशेरा आणि पुंछ या भागामधून जास्तीत दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात आहेत.  गुरेझ, मचल, केरन, तांगधर आणि रामपूर ही ठीकाणं दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत. 

काल पाकिस्तानमधील अल-कायदा या अतिरेकी संघटनेने एक व्हिडिओ व्हायरल करून भारताविरुद्ध युद्ध छेडण्यासाठी अतिरेक्यांना डिवचलं आहे. काश्मीर जिंकायचे असेल तर भारतातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांवर हल्ला करा,' अशी चिथावणीच अल-कायदानं अतिरेक्यांना दिली आहे. जिहादी फोरम या ऑनलाइन साइटवर अलकायदाकडून भारताविरोधी व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. अलकायदाचा एक प्रमुख नेता उसामा महमूद याने हा भारताविरोधात गरळ ओकणारा व्हिडिओ जारी केला आहे. काश्मीरवर वर्चस्व ठेवण्यासाठी भारत काश्मिरात ६ लाख सैनिकांचा वापर करत आहे. अशा वेळी कोलकाता, बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतातील बड्या आणि महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केल्यास भारताचं लक्ष काश्मीरवरून विचलीत होईल. त्यांचं काश्मीरवरचं वर्चस्व कमी होईल आणि आपल्याला काश्मिरात मजबूत संघटन उभारता येईल,  असं उसामाने या व्हिडिओत म्हटलं आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद