शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

13 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आजपासून 'हा' नवा नियम लागू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 13:47 IST

Railway Staff Transfer : आता बदलीचे काम सहज होणार आहे. 

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) 13 लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांची पोस्टिंग त्यांच्या घरापासून बऱ्याचवेळा लांब असते, ही त्यांच्यासाठी एकप्रकारे समस्या असते. त्यामुळे कर्मचारी आपल्या घराजवळ बदली होण्यासाठी प्रयत्न करत राहतात. पण, ते खूप कठीण असते. मात्र आता बदलीचे काम सहज होणार आहे. 

रेल्वे बोर्डाकडून यासंदर्भात एक पॉलिसी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे 13 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना बदल्या करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. 15 ऑगस्ट 2022 पासून देशभरात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. रेल्वेकडून वेगवेगळ्या प्रकारच्या बदल्याही होतात. फॅक्टरी कर्मचार्‍यांची नियमित बदली सहसा कार्यशाळेतच होते.

ज्या विभागात कर्मचाऱ्याचे काम असते, अशाच विभागात कर्मचाऱ्यांची बदली होते. मात्र एखाद्या कर्मचाऱ्याला आंतर विभागीय बदली हवी असेल तर त्यात मोठी अडचण असते. मात्र, जर एखादा कर्मचारी म्युच्युअल बदली करणारा मिळाला तर हे काम सोपे होते. पण, तसे झाले नाही तर ते फार अवघड काम होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बदलीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने 15 ऑगस्ट 2022 (सोमवार) पासून ट्रान्सफर मॉड्यूल लागू केले आहे. 

या अंतर्गत सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) या रेल्वे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या संस्थेने कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचे मॉड्यूल तयार केले आहे. त्याला एचआरएमएस असे नाव देण्यात आले आहे.रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, आंतर विभागीय बदलीचे सर्व अर्ज याद्वारे दाखल केले जातील. याशिवाय ज्यांचा बदलीचा अर्ज आधीच प्रलंबित आहे, तोही त्यावर अपलोड केला जाईल. 

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या मॉड्यूलच्या अंमलबजावणीमुळे बदलीच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. याचबरोबर, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बदलीची वेळ येते, तेव्हा तो एचआरएमएसमध्ये ऑनलाइन अर्ज करू शकेल. एकाच जागेसाठी दोन अर्ज आल्यास पहिल्या अर्जास प्राधान्य दिले जाईल. पर्यवेक्षक, शाखा अधिकारी आणि कर्मचारी विभागाचे अधिकारी देखील कर्मचाऱ्यांच्या अर्जावर त्यांचे मत मांडू शकतील. परंतु बदलीचा अंतिम निर्णय फक्त डीआरएम किंवा एडीआरएमचाच असेल.

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारीIndian Railwayभारतीय रेल्वे