शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 23:41 IST

India Reaction over Israel And Iran Ceasefire: इराण आणि इस्रायलच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. शाश्वत शांतता आणि स्थिरतेसाठी सर्व जण काम करतील, अशी आशा भारताकडून व्यक्त केली आहे.

India Reaction over Israel And Iran Ceasefire: इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी इराणने अमेरिकन लष्कराच्या कतार येथील तळांवर क्षेपणास्त्र डागले. हे युद्ध आता कोणत्या वळवणार जाणार, याकडे जगाचे लक्ष लागले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर केला. परंतु, यानंतर काही तासात स्थिती पुन्हा जैसे थे झाली. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र विभागाकडून महत्त्वाची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच मशहाद येथील भारतीय दूतावासाचा कॉन्टॅक्ट डेस्क बंद करण्यात आला आहे.

इराणमधील भारतीय दूतावासाने एक्सवर पोस्ट करत मशहाद येथील कॉन्टॅक्ट डेस्क बंद करत असल्याची माहिती दिली. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर भारतीय दूतावासाने निर्वासितांसाठी नवीन नावे नोंदणी करण्यासाठी उघडण्यात आलेला संपर्क कक्ष बंद केला आहे. भारत सरकार बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला पुन्हा धोका निर्माण परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन केले जाईल, असे इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. 

इराणमधील भारतीयांनी दूतावासाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे

जे भारतीय इराणच्या इतर भागात आहेत आणि तेथून बाहेर पडण्यासाठी मशहादला येण्याची योजना आखत आहेत, अशांना ते जिथे आहेत तिथेच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच स्थानिक वृत्ते आणि दूतावासाने जारी केलेल्या अद्ययावत माहिती, सूचनांवर लक्ष ठेवावे, असेही इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. दूतावास सद्र हॉटेलमधील खोल्या आणखी २ रात्रींसाठी (२६ जून रोजी चेकआउट वेळेपर्यंत) राखून ठेवेल. यामुळे नागरिकांना इराणमधील सुरक्षा परिस्थिती खरोखरच सामान्य होत आहे, याची खात्री करण्यासाठी वेळ मिळेल. जर कोणाही भारतीय नागरिकांना कोणत्याही सल्ल्याची किंवा मदतीची आवश्यकता असेल किंवा अन्य महत्त्वाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी टेलिग्राम चॅनेलद्वारे किंवा पूर्वी दिलेल्या हेल्पलाइनवर दूतावासाशी संपर्क साधू शकतात. पुढील काही दिवसांसाठी हे संपर्क चॅनेल खुले राहतील, असेही इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात काय म्हटले आहे?

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, इराण आणि इस्रायलमधील संघर्षाशी संबंधित घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. इराणच्या अणुतळांवर अमेरिकेची कारवाई आणि कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने केलेला प्रत्युत्तर या घडामोडींचा यात समावेश आहे. एकात्मिक शाश्वत प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेबाबत आम्हाला खूप चिंता आहे. परंतु, इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामाचे वृत्त आणि ते घडवून आणण्यात अमेरिका आणि कतारने बजावलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. या प्रदेशातील अनेक मुद्दे सोडवण्यासाठी संवादाला पर्याय नाही, हे आम्ही पुन्हा सांगू इच्छितो. भारत या प्रयत्नांमध्ये आपली भूमिका बजावण्यास तयार आहे आणि सर्व संबंधित पक्ष शाश्वत शांतता आणि स्थिरतेसाठी काम करतील, अशी आशा भारताकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :IndiaभारतIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाQatarकतार