शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

परदेशगमन वाढले; गेल्या पाच वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले, कोणत्या देशांकडे ओढा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:07 IST

Indian Citizenship: कोव्हिडनंतर परदेशगमनात वाढ; केंद्राची संसदेत माहिती

Indian Citizenship: दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भारतीय आपले नागरिकत्व सोडत असल्याचे चित्र समोर आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत 9 लाखांहून अधिक भारतीयांनी नागरिकत्वाचा त्याग केला आहे. विशेष म्हणजे 2022 पासून दरवर्षी ही संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. 2011 ते 2024 या कालावधीत एकूण 20.6 लाख (2.06 मिलियन) भारतीयांनी नागरिकत्व सोडले असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक लोकांनी हे पाऊल गेल्या पाच वर्षांत उचलले आहे.

कोव्हिडनंतर संधी मिळताच परदेशगमन

कोव्हिडपूर्व काळात जवळपास दहा वर्षे दरवर्षी सरासरी 1.2 ते 1.45 लाख भारतीय नागरिकत्व सोडत होते. मात्र 2020 मध्ये, प्रवासावरील निर्बंधांमुळे ही संख्या सुमारे 85 हजारांवर आली. कोव्हिडनंतर निर्बंध हटताच पुन्हा एकदा परदेशगमन वाढले आणि 2022 पासून दरवर्षी 2 लाखांपेक्षा अधिक भारतीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला.

नागरिकत्व का सोडत आहेत ?

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नागरिकत्व सोडण्यामागील कारणे ‘वैयक्तिक’ असून ती संबंधित व्यक्तीलाच माहीत असतात. बहुतांश लोक ‘वैयक्तिक सोय’ आणि जागतिक पातळीवरील संधींसाठी परदेशी नागरिकत्व स्वीकारतात. ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या काळात जागतिक कार्यक्षेत्रातील संधी भारत मान्य करतो, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

दुहेरी नागरिकत्वाचा अभाव हा मोठा मुद्दा

भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाची सुविधा नसणे हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. नागरिकत्व कायदा, 1955 च्या कलम 9 नुसार, एखाद्या भारतीयाने परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते. परदेशी नागरिकत्वामुळे मतदानाचा हक्क, सामाजिक सुरक्षा, कायमस्वरूपी निवास, सरकारी नोकऱ्या आणि दीर्घकालीन स्थिरता मिळते. भारताचा ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया (OCI) कार्ड व्हिसामुक्त प्रवास आणि काही आर्थिक हक्क देतो, मात्र मतदान किंवा निवडणूक लढवण्यासारखे राजकीय अधिकार देत नाही.

परदेशात चांगल्या नोकरीच्या संधी

सोशल मीडियावर अनेक जण सांगतात की परदेशात चांगल्या करिअर संधी मिळवण्यासाठी नागरिकत्व सोडावे लागते, मात्र भारतीय ओळख सोडणे भावनिकदृष्ट्या कठीण असते. सध्या हा ट्रेंड केवळ मध्यमवर्गापुरता मर्यादित नसून, श्रीमंत वर्गातही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

भारतीय नागरिक कुठे जात आहेत?

भारतीय नागरिकत्व सोडणारे बहुतांश लोक अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडे वळत आहेत. या देशांचे पासपोर्ट अधिक आकर्षक असून रोजगार, शिक्षण आणि स्थिरतेच्या अधिक संधी उपलब्ध आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 9 Lakh Indians Renounced Citizenship in 5 Years: Migration Surge

Web Summary : Over 9 lakh Indians renounced citizenship in five years, seeking global opportunities. Driven by personal convenience and lack of dual citizenship, most are drawn to the US, UK, Canada, and Australia for better prospects and stability post-COVID restrictions.
टॅग्स :Indiaभारतpassportपासपोर्टAmericaअमेरिकाCanadaकॅनडाAustraliaआॅस्ट्रेलिया