शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

Indian Army: पाक, चीन नाही! भारतीय सैन्याच्या शस्त्र भांडाराला देशातूनच धोका; अतिक्रमणांनी वेढले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 6:56 PM

एम्युनिशन डंप किंवा डेपोमध्ये सैन्याच्या गरजेनुसार गोळ्या, ग्रेनेड,बॉम्ब, माईन्स, रॉकेट आणि मिसाईल असतात. तसेच हे डेपो गरजेच्यावेळी वेगाने पुरवठा व्हावा यासाठी उभारलेले असतात.

गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्याला भीषण आग लागली होती. असाच धोका भारतीय सैन्याच्या शस्त्र भांडाराला उद्भवण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्रांच्या डेपोच्या आजुबाजुला पूर्वी घरे बांधली जात नव्हती. परंतू आता कोणाचाच धरबंध नसल्याने सर्रास अनधिकृत घरे, इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे या शस्त्रांच्या साठ्याला देशातच धोका निर्माण झाला आहे. 

भारतीय सैन्याच्या अनेक एम्युनेशन डंपजवळ आता अनधिकृत वसाहती उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे चिता वाढली आहे. भारतीय सैन्य हा प्रश्न मांडत आहे, परंतू त्यांना स्थानिक यंत्रणांची मदत मिळत नाहीय. अनेक ठिकाणी द वर्क्स ऑफ डिफेंस एक्टचे पालन होत नाहीय, अशी सैन्याची तक्रार आहे. 

एम्युनिशन डंप किंवा डेपोमध्ये सैन्याच्या गरजेनुसार गोळ्या, ग्रेनेड,बॉम्ब, माईन्स, रॉकेट आणि मिसाईल असतात. तसेच हे डेपो गरजेच्यावेळी वेगाने पुरवठा व्हावा यासाठी उभारलेले असतात. स्फोटके असल्याने हे डेपो शहरांच्या एका बाजुला लोकसंख्येपासून दूर उभारण्यात आले आहेत. परंतू आता शहरे वाढू लागली असून ही लोकसंख्या आता या डेपोंच्या वेशीवर येऊन ठेपली आहे.

भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षेचा विचार करून वर्क्स ऑफ डिफेन्स कायदा 1903 मध्ये लागू करण्यात आला होता. ज्यानुसार क्रिटिकल डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट (महत्त्वाचे संरक्षण आस्थापना) च्या आजूबाजूच्या जमिनीच्या वापरावर काही निर्बंध आहेत, परवानगीशिवाय तेथे बांधकाम करता येत नाही. या कायद्यांतर्गत तीन झोन आहेत. अ वर्ग झोनमध्ये 2000 यार्डपर्यंत परवानगीशिवाय जमिनीच्या वर कोणतेही बांधकाम करता येणार नाही. ब वर्ग झोनमध्ये 1000 यार्डपर्यंत परवानगीशिवाय बांधकाम किंवा झाडे लावता येणार नाहीत. क वर्ग झोनमध्ये 500 यार्डांपर्यंत परवानगीशिवाय जमिनीच्या वर किंवा खाली कुठेही बांधकाम करता येणार नाही.

परंतू एम्युनिशन डंप बडोवाल (लुधियाना), एम्युनिशन डंप वाला (अमृतसर), एम्युनिशन डंप पुलगाव (महाराष्ट्र), एम्युनिशन डंप भटिंडा या ठिकाणी नियमांचे सर्वाधिक उल्लंघन झाले आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण झाले आहे. यापैकी अनेक प्रकरणे न्यायालयात पेंडिंग आहेत. यामुळे सैन्यासह नागरिकांनाही य़ापासून धोका आहे. 2016 मध्ये, पुलगाव येथील दारूगोळा डेपोला भीषण आग लागली, ज्यात 11 जवान शहीद झाले होते. 2010 मध्ये पानागढच्या डेपोमध्ये आग लागली आणि त्यानंतर अनेक स्फोट झाले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानEnchroachmentअतिक्रमण