शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

लष्कराला सांगितलं तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल, पण यांना...; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 15:37 IST

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सभागृहात जवळपास २ तास १२ मिनिटांचं भाषण केलंय यामध्ये नरेंद्र मोदी मणिपूर हिंसाचारच्या विषयावर फक्त २ मिनिटं बोलले. नरेंद्र मोदी मणिपूरबाबात बोलताना हसत होते, दोन तास चेष्टा करत होते, अशी टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

मणिपूरचं विभाजन झालं आहे. नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. ते थांबवायचं नाहीय. मणिपूर जळतेय, ते नरेंद्र मोदी विसरलेत, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. भाजपाने मणिपूरचे दोन तुकडे केले. तसेच भारतीय लष्कराला सांगितल्यास मणिपूरमधील सुरु असलेला हिंसाचार ते २ दिवसात थांबवू शकतात. मणिपूर २ दिवसांत शांत होईल, पण त्यांना मणिपूरमधीलआग विझवायची नाहीए, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, मी गेल्या १९ वर्षांपासून राजकारणात आहे. पण मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत पाहिले नाही. प्रत्यक्ष दौऱ्यावेळी मैतेई आणि कुकी समाजातील संघर्ष किती विकोपाला गेला आहे हे मी अनुभवलं आहे. मणिपूर हे एक राज्य राहिलेले नाही. भाजपाने त्याचे तुकडे केले आहेत. मणिपूरमध्ये एवढं सगळं घडत असतानाही पंतप्रधान हसत बोलत होते. ते मणिपूरला जाऊ शकत नाही, याची काही कारणं आहेत. पण त्यांनी किमान मणिपूरबद्दल बोलायला हवं, एवढी आमची अपेक्षा होती, अशी टिप्पणी राहुल यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा