शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हवाईदल प्रमुख भदौरिया यांचा चीनला इशारा; भारताशी खेटने योग्य नाही, आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 21:29 IST

भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

ठळक मुद्देभारत आणि चीन यांच्यात गेल्या 8 महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे.हवाईदल प्रमुख म्हणाले, लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर चीनने मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत.आपणही सर्व प्रकारची आवश्यक ती तयारी केली आहे.

नवी दिल्ली -हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी मंगळवारी चीनला थेट इशारा दिला. चीनला कठोर शब्दात इशारा देताना ते म्हटले, की भारताशी खेटने चीनसाठी जागतिक स्थराचा विचार करता योग्य ठरणार नाही. चीनची महत्वाकांक्षा जागतीक लेवलची असेल, तर ती त्यांच्या योजनांना सूट करत नाही. भदौरिया यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान चीनला हा इशारा दिला. 

चीनकडून मोठ्या प्रमाणावर सैनिकांची तैनाती -हवाईदल प्रमुख म्हणाले, लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर चीनने मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत. त्यांच्या जवळ रडार, जमिनीवरून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मिसाईल्स मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर तैनाती केली आहे. मात्र, आपणही सर्व प्रकारची आवश्यक ती तयारी केली आहे.

लद्दाखमध्ये LACजवळ दोन्ही देशांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर जमलेले आहे -भारत आणि चीन यांच्यात गेल्या 8 महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. लद्दाखमध्ये LACजवळ दोन्ही देशांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर जमलेले आहे. मे महिन्यापासूनच दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात हिंसक झटापटही झाली होती. हा तणाव कमी करण्यासाठी अनेक वेळा सैन्य स्थरावरील चर्चाही झाली. एवढेच नाही, तर दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली आहे.

'चीनची वर्चस्व वाढविण्याची इच्छा' -भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

भारताला अपली क्षमता कायम ठेवण्याची आवश्यकता -व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने भाग घेत भदौरिया म्हणाले, छोटे देश आणि फुटीरतावाद्यांच्या मदतीने चीनला ड्रोन सारखे कमी खरचाचे तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध होत आहे. यामुळे तो प्रतिकूल प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. तसेच, जर स्थिती निर्माण झालीच, तर भारताला कसल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी अपली क्षमता कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही भदौरिया म्हणाले.

टॅग्स :airforceहवाईदलIndiaभारतladakhलडाखchinaचीन