शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

हवाईदल प्रमुख भदौरिया यांचा चीनला इशारा; भारताशी खेटने योग्य नाही, आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 21:29 IST

भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

ठळक मुद्देभारत आणि चीन यांच्यात गेल्या 8 महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे.हवाईदल प्रमुख म्हणाले, लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर चीनने मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत.आपणही सर्व प्रकारची आवश्यक ती तयारी केली आहे.

नवी दिल्ली -हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी मंगळवारी चीनला थेट इशारा दिला. चीनला कठोर शब्दात इशारा देताना ते म्हटले, की भारताशी खेटने चीनसाठी जागतिक स्थराचा विचार करता योग्य ठरणार नाही. चीनची महत्वाकांक्षा जागतीक लेवलची असेल, तर ती त्यांच्या योजनांना सूट करत नाही. भदौरिया यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान चीनला हा इशारा दिला. 

चीनकडून मोठ्या प्रमाणावर सैनिकांची तैनाती -हवाईदल प्रमुख म्हणाले, लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर चीनने मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत. त्यांच्या जवळ रडार, जमिनीवरून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मिसाईल्स मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर तैनाती केली आहे. मात्र, आपणही सर्व प्रकारची आवश्यक ती तयारी केली आहे.

लद्दाखमध्ये LACजवळ दोन्ही देशांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर जमलेले आहे -भारत आणि चीन यांच्यात गेल्या 8 महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. लद्दाखमध्ये LACजवळ दोन्ही देशांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर जमलेले आहे. मे महिन्यापासूनच दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात हिंसक झटापटही झाली होती. हा तणाव कमी करण्यासाठी अनेक वेळा सैन्य स्थरावरील चर्चाही झाली. एवढेच नाही, तर दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली आहे.

'चीनची वर्चस्व वाढविण्याची इच्छा' -भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

भारताला अपली क्षमता कायम ठेवण्याची आवश्यकता -व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने भाग घेत भदौरिया म्हणाले, छोटे देश आणि फुटीरतावाद्यांच्या मदतीने चीनला ड्रोन सारखे कमी खरचाचे तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध होत आहे. यामुळे तो प्रतिकूल प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. तसेच, जर स्थिती निर्माण झालीच, तर भारताला कसल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी अपली क्षमता कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही भदौरिया म्हणाले.

टॅग्स :airforceहवाईदलIndiaभारतladakhलडाखchinaचीन