शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

हवाईदल प्रमुख भदौरिया यांचा चीनला इशारा; भारताशी खेटने योग्य नाही, आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 21:29 IST

भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

ठळक मुद्देभारत आणि चीन यांच्यात गेल्या 8 महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे.हवाईदल प्रमुख म्हणाले, लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर चीनने मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत.आपणही सर्व प्रकारची आवश्यक ती तयारी केली आहे.

नवी दिल्ली -हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी मंगळवारी चीनला थेट इशारा दिला. चीनला कठोर शब्दात इशारा देताना ते म्हटले, की भारताशी खेटने चीनसाठी जागतिक स्थराचा विचार करता योग्य ठरणार नाही. चीनची महत्वाकांक्षा जागतीक लेवलची असेल, तर ती त्यांच्या योजनांना सूट करत नाही. भदौरिया यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान चीनला हा इशारा दिला. 

चीनकडून मोठ्या प्रमाणावर सैनिकांची तैनाती -हवाईदल प्रमुख म्हणाले, लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर चीनने मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत. त्यांच्या जवळ रडार, जमिनीवरून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मिसाईल्स मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर तैनाती केली आहे. मात्र, आपणही सर्व प्रकारची आवश्यक ती तयारी केली आहे.

लद्दाखमध्ये LACजवळ दोन्ही देशांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर जमलेले आहे -भारत आणि चीन यांच्यात गेल्या 8 महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. लद्दाखमध्ये LACजवळ दोन्ही देशांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर जमलेले आहे. मे महिन्यापासूनच दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात हिंसक झटापटही झाली होती. हा तणाव कमी करण्यासाठी अनेक वेळा सैन्य स्थरावरील चर्चाही झाली. एवढेच नाही, तर दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली आहे.

'चीनची वर्चस्व वाढविण्याची इच्छा' -भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

भारताला अपली क्षमता कायम ठेवण्याची आवश्यकता -व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने भाग घेत भदौरिया म्हणाले, छोटे देश आणि फुटीरतावाद्यांच्या मदतीने चीनला ड्रोन सारखे कमी खरचाचे तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध होत आहे. यामुळे तो प्रतिकूल प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. तसेच, जर स्थिती निर्माण झालीच, तर भारताला कसल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी अपली क्षमता कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही भदौरिया म्हणाले.

टॅग्स :airforceहवाईदलIndiaभारतladakhलडाखchinaचीन