शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

Pulwama Attack: पाकिस्तानची वाट लागणार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढल्यावर 'बाजार उठणार'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 13:01 IST

पुलवामामधील हल्ल्यानंतर भारताचं कठोर पाऊल

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड राष्ट्राचा दर्जा भारताकडून काढण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. गुरुवार पुलवामातील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये 37 जवान शहीद झाले, तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. संपूर्ण देशभरातून या हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. ही संघटना पाकिस्तानमधील आहे. या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानातून संपूर्ण कारवायांची सूत्रं हलवतो. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा तीव्र निषेध केला. आज भारतानं पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेत असल्याची घोषणा केली. या प्रकारचा दर्जा दिल्यावर समोरच्या देशाला व्यापार करताना विशेष सूट दिली जाते. जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांच्या नियमांनुसार मोस्ट फेवर्ड नेशनचा दिला जातो. ज्या देशाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला जातो, तो देश दुसऱ्या देशांच्या तुलनेत तोट्यात राहू शकत नाही. ज्यावेळी एका देशाला असा दर्जा दिला जातो, त्यावेळी त्यानं व्यापार शुल्क कमी करावं अशी अपेक्षा असते. दोन देश एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देऊ शकतात. असा दर्जा दिल्यावर संबंधित देश कोणत्याही आयात आणि निर्यात शुल्काशिवाय व्यापार करु शकतात. भारतानं 1996 मध्ये पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला. मात्र पाकिस्ताननं अद्याप भारताला असा दर्जा दिलेला नाही. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळाल्यावर काय फायदा होतो?ज्या देशाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला जातो, त्या देशाला व्यापारात अधिक प्राधान्य दिलं जातं. असा दर्जा देण्यात आल्यावर आयात-निर्यातीत विशेष सूट मिळते. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळालेला देश कमीत कमी आयात शुल्क भरुन व्यापार करु शकतो. भारतानं पाकिस्तानला असा दर्जा दिला होता. त्यामुळे भारताशी व्यापार करताना पाकिस्तानला मोठा फायदा व्हायचा. कधी मागे घेतला जाऊ शकतो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा?जागतिक व्यापार संघटनेनं कलम 21बी मध्ये मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा कधी मागे घेतला जाऊ शकतो, याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये सुरक्षेसंबंधी वाद निर्माण झाल्यास असा दर्जा काढून घेतला जाऊ शकतो. मात्र यासाठी काही अटींची पूर्तता करणं गरजेचं असतं.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीbusinessव्यवसाय