शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकशी चर्चा करावी - विद्यार्थी, विविध देशांच्या राजदूतांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 03:27 IST

पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे.

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्ताननेभारताला हवाई हद्द बंद केली होती. ती उठविण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी मध्य आशियातील देशांत शिकत असलेले भारतीय विद्यार्थी व विविध देशांच्या राजदूतांनी केली आहे.कझाकस्तान या देशातील अल्माटी शहरातल्या कझाक राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या सहाव्या वर्षात शिकत असलेल्या आशुतोषकुमार सिंह या विद्यार्थ्याने सांगितले की, भारतातून कझाकस्तानला येण्यासाठी पूर्वी तिकीटाचा दर प्रत्येकी ३० हजार रुपयेहोता.पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे. इतके महागड्या दराचे तिकीट घेणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. ही स्थिती आम्ही तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना समाजमाध्यमांद्वारे कळविली होती. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.मध्य आशियाई देशातील कंपन्यांची जी विमाने भारतातून जातात त्यांना पाकिस्तानच्या हवाईहद्द बंदीमुळे लांबचा वळसाघालून आपल्या मुक्कामाला जावेलागते.कझाकस्तानमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला जिथे जायचे आहे त्या प्रवासाशी संलग्न असलेले दुसरेविमान मिळेपर्यंत मध्य आशियाकिंवा आखाती देशांच्या विमानतळावर कधी कधी दिवसभर किंवात्यापेक्षा जास्त वेळ ताटकळत बसावे लागते.दिल्ली ते मॉस्को प्रवासाला आठ तासपुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटवर हल्ला केला. तणाव असतानाही कर्तारपूर कॉरिडॉर विकसित करण्यासंदर्भात दोन्ही देशांत चर्चा सुरूच होती. या विषयाबद्दल जर चर्चा होऊ शकते तर हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकिस्तानशी चर्चा करायला हरकत नाही असे वैद्यकीय शाखेत शिकणाºया झुबेर या विद्यार्थ्याने म्हटले आहे.रशियाच्या राजदूताने सांगितले की, भारतावरील पाकिस्तानची हवाई हद्द बंदी कधी उठते याची रशियादेखील वाट पाहत आहे. या बंदीमुळे दिल्लीहून मॉस्कोला विमानाने जाण्यासाठी सध्या आठ तास लागत आहेत. किव ते दिल्लीदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी दोन तासांनी वाढला आहे, असे युक्रेनच्या राजदूताने म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत