शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकशी चर्चा करावी - विद्यार्थी, विविध देशांच्या राजदूतांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 03:27 IST

पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे.

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्ताननेभारताला हवाई हद्द बंद केली होती. ती उठविण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी मध्य आशियातील देशांत शिकत असलेले भारतीय विद्यार्थी व विविध देशांच्या राजदूतांनी केली आहे.कझाकस्तान या देशातील अल्माटी शहरातल्या कझाक राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या सहाव्या वर्षात शिकत असलेल्या आशुतोषकुमार सिंह या विद्यार्थ्याने सांगितले की, भारतातून कझाकस्तानला येण्यासाठी पूर्वी तिकीटाचा दर प्रत्येकी ३० हजार रुपयेहोता.पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे. इतके महागड्या दराचे तिकीट घेणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. ही स्थिती आम्ही तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना समाजमाध्यमांद्वारे कळविली होती. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.मध्य आशियाई देशातील कंपन्यांची जी विमाने भारतातून जातात त्यांना पाकिस्तानच्या हवाईहद्द बंदीमुळे लांबचा वळसाघालून आपल्या मुक्कामाला जावेलागते.कझाकस्तानमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला जिथे जायचे आहे त्या प्रवासाशी संलग्न असलेले दुसरेविमान मिळेपर्यंत मध्य आशियाकिंवा आखाती देशांच्या विमानतळावर कधी कधी दिवसभर किंवात्यापेक्षा जास्त वेळ ताटकळत बसावे लागते.दिल्ली ते मॉस्को प्रवासाला आठ तासपुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटवर हल्ला केला. तणाव असतानाही कर्तारपूर कॉरिडॉर विकसित करण्यासंदर्भात दोन्ही देशांत चर्चा सुरूच होती. या विषयाबद्दल जर चर्चा होऊ शकते तर हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकिस्तानशी चर्चा करायला हरकत नाही असे वैद्यकीय शाखेत शिकणाºया झुबेर या विद्यार्थ्याने म्हटले आहे.रशियाच्या राजदूताने सांगितले की, भारतावरील पाकिस्तानची हवाई हद्द बंदी कधी उठते याची रशियादेखील वाट पाहत आहे. या बंदीमुळे दिल्लीहून मॉस्कोला विमानाने जाण्यासाठी सध्या आठ तास लागत आहेत. किव ते दिल्लीदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी दोन तासांनी वाढला आहे, असे युक्रेनच्या राजदूताने म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत