शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

पाक दिनाच्या कार्यक्रमात भारत गैरहजर राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:12 IST

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमानिमित्त दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला भारताचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली आहे

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमानिमित्त दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला भारताचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानने या कार्यक्रमासाठी जम्मू काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांनाही निमंत्रण दिलंय.त्यामुळे भारताने या कार्यकमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी सूत्रांनी सांगितल्यानुसार भारताचे प्रतिनिधी पाकिस्तानच्या या कार्यक्रमापासून लांब राहणार आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला सरकारचा एकही प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर अनेक वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या या कृत्यामुळे भारत नाराज आहे. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून एअऱ स्ट्राइक केले यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची परिस्थिती आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाही काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरवर बंदी आणावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. अजहर पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत बहावलपूरमध्ये वास्तव्य करतो. तरीही पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कारवाई होत नाही.अनेक वर्षापासून भारत संयुक्त राष्ट्र परिषदेत जैशसारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र जैशच्या संस्थापकावर बंदी आणली  जात नाही.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला