शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

भारतात लोकसंख्येचा स्फोट होणार नाही; २०३६ मध्ये लोकसंख्या १५२ कोटींवर राहील स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:11 IST

भारताच्या जन्मदरातही २००३ पासून सातत्याने घट होत असून प्रति हजारी २४.८ वरून २०१९ मध्ये जन्मदर १९.७ वर आला आहे. महानिबंधक आणि जनगणना आयुक्तालयाने काढलेला हा निष्कर्ष आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली :  लोकसंख्येच्या स्फोटाच्या दिशेने भारताची वाटचाल नाही.  याउलट राज्यांतील  लोकसंख्येतील वाढ सातत्याने घटत आहे. लोकसंख्या वाढीचा कल स्थिरीकरणाकडे असून २०३६ मध्ये भारताची लोकसंख्या १५२.२० कोटीपर्यंत वाढेल, असे सरकारने अधिकृतपणे सांगितले.

भारत आणि राज्यांतील लोकसंख्येचा अंदाज (२०११-३६ ) या शीर्षकाखालील तज्ज्ञ गटाच्या अहवालानुसार  २०११च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१.१० कोटींवरून २०३६ मध्ये १५२.२० कोटींपर्यंत जाईल. लोकसंख्या राष्ट्रीय आयोगाने हा अहवाल तयार केला आहे. समृद्धशाली राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये लोकसंख्या वाढीचा दर १४.५  आहे; परंतु, हरियाणातील लोकसंख्या वाढीचा दर मात्र २०.१ असून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हा दर १४.४  आहे. तथापि, उत्तर प्रदेशात हा दर २५.४, बिहार २५.८, आसाम २१, झारखंड २२.३, मध्य प्रदेशात २४.५ आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्या वाढीचा दर १४.९ वर आला आहे. 

 देशात जन्मदरातही घट --    भारताच्या जन्मदरातही २००३ पासून सातत्याने घट होत असून प्रति हजारी २४.८ वरून २०१९ मध्ये जन्मदर १९.७ वर आला आहे. महानिबंधक आणि जनगणनाआयुक्तालयाने काढलेला हा निष्कर्ष आहे.

-    महाराष्ट्रातील स्थूल जन्मदर (सीबीआर) राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी म्हणजे १५.३  असून गोव्यातील जन्मदर १२.३ आहे.

-    ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी महाराष्ट्रासह २६ राज्यांतील लोकसंख्या वाढीत मोठी घट होत असून ही मोठी समाधानाची बाब आहे. 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र