शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारतात लोकसंख्येचा स्फोट होणार नाही; २०३६ मध्ये लोकसंख्या १५२ कोटींवर राहील स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:11 IST

भारताच्या जन्मदरातही २००३ पासून सातत्याने घट होत असून प्रति हजारी २४.८ वरून २०१९ मध्ये जन्मदर १९.७ वर आला आहे. महानिबंधक आणि जनगणना आयुक्तालयाने काढलेला हा निष्कर्ष आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली :  लोकसंख्येच्या स्फोटाच्या दिशेने भारताची वाटचाल नाही.  याउलट राज्यांतील  लोकसंख्येतील वाढ सातत्याने घटत आहे. लोकसंख्या वाढीचा कल स्थिरीकरणाकडे असून २०३६ मध्ये भारताची लोकसंख्या १५२.२० कोटीपर्यंत वाढेल, असे सरकारने अधिकृतपणे सांगितले.

भारत आणि राज्यांतील लोकसंख्येचा अंदाज (२०११-३६ ) या शीर्षकाखालील तज्ज्ञ गटाच्या अहवालानुसार  २०११च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१.१० कोटींवरून २०३६ मध्ये १५२.२० कोटींपर्यंत जाईल. लोकसंख्या राष्ट्रीय आयोगाने हा अहवाल तयार केला आहे. समृद्धशाली राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये लोकसंख्या वाढीचा दर १४.५  आहे; परंतु, हरियाणातील लोकसंख्या वाढीचा दर मात्र २०.१ असून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हा दर १४.४  आहे. तथापि, उत्तर प्रदेशात हा दर २५.४, बिहार २५.८, आसाम २१, झारखंड २२.३, मध्य प्रदेशात २४.५ आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्या वाढीचा दर १४.९ वर आला आहे. 

 देशात जन्मदरातही घट --    भारताच्या जन्मदरातही २००३ पासून सातत्याने घट होत असून प्रति हजारी २४.८ वरून २०१९ मध्ये जन्मदर १९.७ वर आला आहे. महानिबंधक आणि जनगणनाआयुक्तालयाने काढलेला हा निष्कर्ष आहे.

-    महाराष्ट्रातील स्थूल जन्मदर (सीबीआर) राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी म्हणजे १५.३  असून गोव्यातील जन्मदर १२.३ आहे.

-    ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी महाराष्ट्रासह २६ राज्यांतील लोकसंख्या वाढीत मोठी घट होत असून ही मोठी समाधानाची बाब आहे. 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र