शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

भारतात लोकसंख्येचा स्फोट होणार नाही; २०३६ मध्ये लोकसंख्या १५२ कोटींवर राहील स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:11 IST

भारताच्या जन्मदरातही २००३ पासून सातत्याने घट होत असून प्रति हजारी २४.८ वरून २०१९ मध्ये जन्मदर १९.७ वर आला आहे. महानिबंधक आणि जनगणना आयुक्तालयाने काढलेला हा निष्कर्ष आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली :  लोकसंख्येच्या स्फोटाच्या दिशेने भारताची वाटचाल नाही.  याउलट राज्यांतील  लोकसंख्येतील वाढ सातत्याने घटत आहे. लोकसंख्या वाढीचा कल स्थिरीकरणाकडे असून २०३६ मध्ये भारताची लोकसंख्या १५२.२० कोटीपर्यंत वाढेल, असे सरकारने अधिकृतपणे सांगितले.

भारत आणि राज्यांतील लोकसंख्येचा अंदाज (२०११-३६ ) या शीर्षकाखालील तज्ज्ञ गटाच्या अहवालानुसार  २०११च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१.१० कोटींवरून २०३६ मध्ये १५२.२० कोटींपर्यंत जाईल. लोकसंख्या राष्ट्रीय आयोगाने हा अहवाल तयार केला आहे. समृद्धशाली राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये लोकसंख्या वाढीचा दर १४.५  आहे; परंतु, हरियाणातील लोकसंख्या वाढीचा दर मात्र २०.१ असून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हा दर १४.४  आहे. तथापि, उत्तर प्रदेशात हा दर २५.४, बिहार २५.८, आसाम २१, झारखंड २२.३, मध्य प्रदेशात २४.५ आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्या वाढीचा दर १४.९ वर आला आहे. 

 देशात जन्मदरातही घट --    भारताच्या जन्मदरातही २००३ पासून सातत्याने घट होत असून प्रति हजारी २४.८ वरून २०१९ मध्ये जन्मदर १९.७ वर आला आहे. महानिबंधक आणि जनगणनाआयुक्तालयाने काढलेला हा निष्कर्ष आहे.

-    महाराष्ट्रातील स्थूल जन्मदर (सीबीआर) राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी म्हणजे १५.३  असून गोव्यातील जन्मदर १२.३ आहे.

-    ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी महाराष्ट्रासह २६ राज्यांतील लोकसंख्या वाढीत मोठी घट होत असून ही मोठी समाधानाची बाब आहे. 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र